शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

उल्हासनगरात ११ हजार जणांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांवर कारवाई केली आहे. एकूण ५५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अभियंत्यांनी केले आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नं- १,२ व ३ (पश्चिम) विभाग हा महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये, तर कॅम्प नं- ४ व ५ (शहर पूर्व) परिसरासह अंबरनाथ शहर हे महावितरणच्या विभाग-२ मध्ये येतो. महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये ९६ हजारांपेक्षा जास्त वीजमीटरची संख्या आहे. तर विभाग-२ मध्ये शहर पूर्वेतील ७५ हजारांपेक्षा जास्त वीजमीटर ग्राहक असून त्यामध्ये वाणिज्य व सामाजिक संस्था, देवस्थान यांचा समावेश आहे. शहरात अशी एकूण १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या तर बहुतांश जणांच्या वेतनात कपात झाली. व्यवसायाला उतरती कळा लागून अनेक जण बेकार झाले. परिणामी, यातूनच वीजमाफी व वीजबिल कमी करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. वीजबिल माफ होईल अथवा कमी होईल, या आशेतून कोरोना दरम्यानच्या काळात अनेकांनी वीजबिलांचा भरणा नियमित केला नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची संख्या वाढली.

शहरात एकूण १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांची संख्या आहे. त्यापैकी थकबाकी ग्राहकांची संख्या ५५ हजारांपेक्षा जास्त असून त्यांची टक्केवारी ३० टक्के आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक सावंत व राजाराम राठोड यांनी दिली. नागरिकांनी वेळेत वीजबिलाचा भरणा केल्यास थकबाकीची संख्या कमी होईल, असे ते म्हणाले. तसेच थकबाकी असलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त थकबाकीधारकांवर महावितरणने कारवाई केली असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. थकबाकीधारकांमध्ये बंद घरे, दुकाने, लहान कारखाने यांचा समावेश असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात थकबाकीवरील कारवाईच्यावेळी महावितरण कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या रोषाला बळी पडत असून यातून हाणामारीचे प्रकार झाले आहेत.

-------------------------------

माफी नको, मात्र सवलत द्या

कोरोनाकाळात वीजबिले दुप्पट आली असून वाढीव बिले राज्य सरकार कमी करेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, उलट घरगुती थकबाकी वीजग्राहकांची वीज खंडित करण्याच्या प्रमाणात वाढ झाली, असा आरोप एका थकबाकी वीजग्राहकाने केला. घरात वीजपुरवठा सुरू नसल्यास सर्वच कामे ठप्प पडतात. सरकरने वीजमाफी नको, मात्र सवलत द्यावी. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचनावजा विनंती केली.