शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

उल्हासनगरात ११ हजार जणांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांवर कारवाई केली आहे. एकूण ५५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अभियंत्यांनी केले आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नं- १,२ व ३ (पश्चिम) विभाग हा महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये, तर कॅम्प नं- ४ व ५ (शहर पूर्व) परिसरासह अंबरनाथ शहर हे महावितरणच्या विभाग-२ मध्ये येतो. महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये ९६ हजारांपेक्षा जास्त वीजमीटरची संख्या आहे. तर विभाग-२ मध्ये शहर पूर्वेतील ७५ हजारांपेक्षा जास्त वीजमीटर ग्राहक असून त्यामध्ये वाणिज्य व सामाजिक संस्था, देवस्थान यांचा समावेश आहे. शहरात अशी एकूण १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या तर बहुतांश जणांच्या वेतनात कपात झाली. व्यवसायाला उतरती कळा लागून अनेक जण बेकार झाले. परिणामी, यातूनच वीजमाफी व वीजबिल कमी करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. वीजबिल माफ होईल अथवा कमी होईल, या आशेतून कोरोना दरम्यानच्या काळात अनेकांनी वीजबिलांचा भरणा नियमित केला नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची संख्या वाढली.

शहरात एकूण १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांची संख्या आहे. त्यापैकी थकबाकी ग्राहकांची संख्या ५५ हजारांपेक्षा जास्त असून त्यांची टक्केवारी ३० टक्के आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक सावंत व राजाराम राठोड यांनी दिली. नागरिकांनी वेळेत वीजबिलाचा भरणा केल्यास थकबाकीची संख्या कमी होईल, असे ते म्हणाले. तसेच थकबाकी असलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त थकबाकीधारकांवर महावितरणने कारवाई केली असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. थकबाकीधारकांमध्ये बंद घरे, दुकाने, लहान कारखाने यांचा समावेश असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात थकबाकीवरील कारवाईच्यावेळी महावितरण कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या रोषाला बळी पडत असून यातून हाणामारीचे प्रकार झाले आहेत.

-------------------------------

माफी नको, मात्र सवलत द्या

कोरोनाकाळात वीजबिले दुप्पट आली असून वाढीव बिले राज्य सरकार कमी करेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, उलट घरगुती थकबाकी वीजग्राहकांची वीज खंडित करण्याच्या प्रमाणात वाढ झाली, असा आरोप एका थकबाकी वीजग्राहकाने केला. घरात वीजपुरवठा सुरू नसल्यास सर्वच कामे ठप्प पडतात. सरकरने वीजमाफी नको, मात्र सवलत द्यावी. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचनावजा विनंती केली.