शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ११ हजार जणांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांवर कारवाई केली आहे. एकूण ५५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अभियंत्यांनी केले आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नं- १,२ व ३ (पश्चिम) विभाग हा महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये, तर कॅम्प नं- ४ व ५ (शहर पूर्व) परिसरासह अंबरनाथ शहर हे महावितरणच्या विभाग-२ मध्ये येतो. महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये ९६ हजारांपेक्षा जास्त वीजमीटरची संख्या आहे. तर विभाग-२ मध्ये शहर पूर्वेतील ७५ हजारांपेक्षा जास्त वीजमीटर ग्राहक असून त्यामध्ये वाणिज्य व सामाजिक संस्था, देवस्थान यांचा समावेश आहे. शहरात अशी एकूण १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या तर बहुतांश जणांच्या वेतनात कपात झाली. व्यवसायाला उतरती कळा लागून अनेक जण बेकार झाले. परिणामी, यातूनच वीजमाफी व वीजबिल कमी करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. वीजबिल माफ होईल अथवा कमी होईल, या आशेतून कोरोना दरम्यानच्या काळात अनेकांनी वीजबिलांचा भरणा नियमित केला नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची संख्या वाढली.

शहरात एकूण १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांची संख्या आहे. त्यापैकी थकबाकी ग्राहकांची संख्या ५५ हजारांपेक्षा जास्त असून त्यांची टक्केवारी ३० टक्के आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक सावंत व राजाराम राठोड यांनी दिली. नागरिकांनी वेळेत वीजबिलाचा भरणा केल्यास थकबाकीची संख्या कमी होईल, असे ते म्हणाले. तसेच थकबाकी असलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त थकबाकीधारकांवर महावितरणने कारवाई केली असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. थकबाकीधारकांमध्ये बंद घरे, दुकाने, लहान कारखाने यांचा समावेश असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात थकबाकीवरील कारवाईच्यावेळी महावितरण कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या रोषाला बळी पडत असून यातून हाणामारीचे प्रकार झाले आहेत.

-------------------------------

माफी नको, मात्र सवलत द्या

कोरोनाकाळात वीजबिले दुप्पट आली असून वाढीव बिले राज्य सरकार कमी करेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, उलट घरगुती थकबाकी वीजग्राहकांची वीज खंडित करण्याच्या प्रमाणात वाढ झाली, असा आरोप एका थकबाकी वीजग्राहकाने केला. घरात वीजपुरवठा सुरू नसल्यास सर्वच कामे ठप्प पडतात. सरकरने वीजमाफी नको, मात्र सवलत द्यावी. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचनावजा विनंती केली.