शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

उल्हासनगरात ११ हजार जणांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांवर कारवाई केली आहे. एकूण ५५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अभियंत्यांनी केले आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नं- १,२ व ३ (पश्चिम) विभाग हा महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये, तर कॅम्प नं- ४ व ५ (शहर पूर्व) परिसरासह अंबरनाथ शहर हे महावितरणच्या विभाग-२ मध्ये येतो. महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये ९६ हजारांपेक्षा जास्त वीजमीटरची संख्या आहे. तर विभाग-२ मध्ये शहर पूर्वेतील ७५ हजारांपेक्षा जास्त वीजमीटर ग्राहक असून त्यामध्ये वाणिज्य व सामाजिक संस्था, देवस्थान यांचा समावेश आहे. शहरात अशी एकूण १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या तर बहुतांश जणांच्या वेतनात कपात झाली. व्यवसायाला उतरती कळा लागून अनेक जण बेकार झाले. परिणामी, यातूनच वीजमाफी व वीजबिल कमी करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. वीजबिल माफ होईल अथवा कमी होईल, या आशेतून कोरोना दरम्यानच्या काळात अनेकांनी वीजबिलांचा भरणा नियमित केला नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची संख्या वाढली.

शहरात एकूण १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांची संख्या आहे. त्यापैकी थकबाकी ग्राहकांची संख्या ५५ हजारांपेक्षा जास्त असून त्यांची टक्केवारी ३० टक्के आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक सावंत व राजाराम राठोड यांनी दिली. नागरिकांनी वेळेत वीजबिलाचा भरणा केल्यास थकबाकीची संख्या कमी होईल, असे ते म्हणाले. तसेच थकबाकी असलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त थकबाकीधारकांवर महावितरणने कारवाई केली असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. थकबाकीधारकांमध्ये बंद घरे, दुकाने, लहान कारखाने यांचा समावेश असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात थकबाकीवरील कारवाईच्यावेळी महावितरण कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या रोषाला बळी पडत असून यातून हाणामारीचे प्रकार झाले आहेत.

-------------------------------

माफी नको, मात्र सवलत द्या

कोरोनाकाळात वीजबिले दुप्पट आली असून वाढीव बिले राज्य सरकार कमी करेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, उलट घरगुती थकबाकी वीजग्राहकांची वीज खंडित करण्याच्या प्रमाणात वाढ झाली, असा आरोप एका थकबाकी वीजग्राहकाने केला. घरात वीजपुरवठा सुरू नसल्यास सर्वच कामे ठप्प पडतात. सरकरने वीजमाफी नको, मात्र सवलत द्यावी. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचनावजा विनंती केली.