शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ठाण्यातील ४५८ हॉटेल, पबवर उद्यापासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:51 IST

मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली.

ठाणे : मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली नसेल त्यांच्यावर सोमवारपासून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. शहरातील ४५८ हॉटेल, पब, बारवाल्यांना ९० दिवसांच्या मुदतीत अग्निशमन विभागाचे परवाने मिळवता न आल्याने त्या सर्वांवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. परंतु ही कारवाई कोणत्या स्वरुपाची असेल याचा उल्लेख मात्र त्यांनी केलेला नाही.कारवाई करतांना कायद्याच्या बाजू पडताळूनच करणे योग्य ठरेल, अन्यथा भविष्यात आपणच अडचणीत येऊ. त्यामुळे त्याची खबरदारी घेतली जाईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील हॉटेल, बार अशा ४५८ आस्थापनांना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या. त्यामुळे एनओसीसाठी धावपळ सुरु झाली.प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कंपाऊंडचा मुद्दा उपस्थित केला. तेथील हॉटेल, बार आणि पबवरील कारवाईचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. या सर्व आस्थापनांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, असे त्यांनी विचारले. यावर अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले असल्याचे स्पष्ट केले.येथील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत संपली, त्यांनंतर हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत दिल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.कारवाई करताना तांत्रिक बाबी तपासून पाहणारमुंबईत कमला मिलसारखी दुर्घटना घडल्यांनंतरही आपण ठाण्यात कारवाई का केली नाही. यापूर्वी कोठारी कंपाऊडमध्ये आगीच्या १३ दुर्घटना घडल्या आहेत. मग तुम्ही कसली प्रतीक्षा करत आहात, असा सवाल नारायण पवार, सुनेश जोशी, भरत चव्हाण, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील यांनी केला.आयुक्त जयस्वाल म्हणाले की, हा अत्यंत संवेदनशील विषय असून आम्ही यापूर्वी भरपूर हॉटेलवर कारवाई केली आहे. आम्ही या सर्व हॉटेलमालकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिली होती.या मुदतीत त्यांनी योग्य कागदपत्रे सादर न केल्यास सोमवारपासून आम्ही हॉटेल सील करू. परंतु कारवाई करताना काही तांत्रिक बाबी पडताळून पाहणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कारवाई केल्यानंतर भविष्यात आपणच अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे