शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ४५८ हॉटेल, पबवर उद्यापासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:51 IST

मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली.

ठाणे : मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली नसेल त्यांच्यावर सोमवारपासून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. शहरातील ४५८ हॉटेल, पब, बारवाल्यांना ९० दिवसांच्या मुदतीत अग्निशमन विभागाचे परवाने मिळवता न आल्याने त्या सर्वांवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. परंतु ही कारवाई कोणत्या स्वरुपाची असेल याचा उल्लेख मात्र त्यांनी केलेला नाही.कारवाई करतांना कायद्याच्या बाजू पडताळूनच करणे योग्य ठरेल, अन्यथा भविष्यात आपणच अडचणीत येऊ. त्यामुळे त्याची खबरदारी घेतली जाईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील हॉटेल, बार अशा ४५८ आस्थापनांना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या. त्यामुळे एनओसीसाठी धावपळ सुरु झाली.प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कंपाऊंडचा मुद्दा उपस्थित केला. तेथील हॉटेल, बार आणि पबवरील कारवाईचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. या सर्व आस्थापनांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, असे त्यांनी विचारले. यावर अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले असल्याचे स्पष्ट केले.येथील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत संपली, त्यांनंतर हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत दिल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.कारवाई करताना तांत्रिक बाबी तपासून पाहणारमुंबईत कमला मिलसारखी दुर्घटना घडल्यांनंतरही आपण ठाण्यात कारवाई का केली नाही. यापूर्वी कोठारी कंपाऊडमध्ये आगीच्या १३ दुर्घटना घडल्या आहेत. मग तुम्ही कसली प्रतीक्षा करत आहात, असा सवाल नारायण पवार, सुनेश जोशी, भरत चव्हाण, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील यांनी केला.आयुक्त जयस्वाल म्हणाले की, हा अत्यंत संवेदनशील विषय असून आम्ही यापूर्वी भरपूर हॉटेलवर कारवाई केली आहे. आम्ही या सर्व हॉटेलमालकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिली होती.या मुदतीत त्यांनी योग्य कागदपत्रे सादर न केल्यास सोमवारपासून आम्ही हॉटेल सील करू. परंतु कारवाई करताना काही तांत्रिक बाबी पडताळून पाहणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कारवाई केल्यानंतर भविष्यात आपणच अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे