शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

प्रवाशांना अडसर ठरणाऱ्या रिक्षांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकालगत प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर रिक्षाचालकांकडून अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण करणाऱ्या या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी ...

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकालगत प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर रिक्षाचालकांकडून अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण करणाऱ्या या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून रस्ता मोकळा केला.

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी असते. रोज हजारो प्रवासी येथून ये-जा करतात. येथे रस्ता अरुंद असून त्यात महापालिकेने राजकारण्यांच्या आग्रहाखातर ८ कोटी रुपयांचे सुशोभीकरणचे काम काढून लोकांच्या त्रासात भर टाकली आहे.

या सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे स्थानकात दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन देखील मदतीसाठी पोहोचू शकत नाही अशी स्थिती आहे. ‘लोकमत’ने याबाबत गेल्या वर्षां पासून सातत्याने बातम्या दिल्यानंतर एका बाजूने बांधकाम काढून टाकत रेल्वे स्थानकात जाण्यास डांबरी रस्ता पालिकेने बनवला. पण त्यालादेखील रिक्षा, फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगच्या अतिक्रमणचा विळखा पडला आहे. त्यामुळे प्रवाशांना ये जा करणे त्रासाचे बनले आहे.

शनिवारी डांबरी रस्त्यावर रिक्षाचालकांनी चालवलेल्या अतिक्रमणाची तक्रार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याकडे गेली. त्यांनी वाहतूक पोलीस पाठवून रिक्षा काढायला लावून रस्ता मोकळा केला. रिक्षाचालकांनी मनमानी केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे भामे यांनी सांगितले.