शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नऊ धोकादायक इमारतींवर कारवाई

By admin | Updated: March 13, 2016 02:33 IST

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या २८ धोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत नऊ इमारतीच तोडल्या आहेत. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात तर तीन इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे

मीरा रोड : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या २८ धोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत नऊ इमारतीच तोडल्या आहेत. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात तर तीन इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे. धोकादायक झालेल्या नऊ इमारतींमध्ये आजही रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. मार्चअखेर या इमारती रिकाम्या करून जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. भार्इंदर व मीरा रोडमध्ये ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या काळात दाटीवाटीने वसलेल्या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. पालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. तरीही, प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. इमारतींना नोटिसा बजावण्याशिवाय काहीच होत नसे. यातूनच इमारत वा भाग कोसळून गेल्या काही वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. खारीगावातील लता इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सर्वात जास्त होती.लतासह मुंबई, ठाण्यात धोकादायक इमारती कोसळल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने धोकादायक इमारती रिकाम्या करून तोडण्याची कारवाई काही अंशी सुरू केली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पालिकेने २८ धोकदायक इमारती जाहीर केल्या होत्या. त्यातील नऊ इमारती तोडण्यात आल्या. तीन इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालानंतर दुरुस्तीची परवानगी देण्यात आली. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात आहे. तर, नऊ इमारतींमध्ये आजही रहिवासी राहत आहेत. तर, चार इमारती रिकाम्या असून तोडण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. वास्तविक, पावसाळ्याच्या आधीच या सर्व इमारती पाडणे आवश्यक होते. दुसरा पावसाळा तोंडावर आला असताना पालिका पुन्हा जागी झाली आहे. एप्रिलमध्ये पालिकेला धोकादायक इमारतींची यादी जाहीर करावी लागणार आहे. भार्इंदर पश्चिम प्रभाग समिती-१ मध्ये फिलोमीना गोम्स यांचे घर धोकादायक ठरवले आहे. आयुक्तांनी ते १९ मार्चपर्यंत तोडण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिमेस प्रभाग समिती-२ मध्ये तीन मजली उषाकिरण व गजानन निवास या धोकादायक इमारती असून गजानन निवासचे प्रकरण न्यायालयात आहे. भार्इंदर पूर्वेतील प्रभाग समिती क्रमांक-३ मध्ये डिव्हाइन शॅरेटॉन प्लाझा या इमारतीमध्ये रहिवासी राहतात. तर, समिती क्रमांक-४ मधील कल्याण कॉटेज, केतकी निवास, राजीव अपार्टमेंट, साई मंगलम व वेतोस्कर विहार या पाच धोकादायक इमारतींत नागरिक राहतात. यातील कल्याण कॉटेजचे प्रकरण न्यायालयात आहे. राजीव अपार्टमेंटची आयआयटीने तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. तर, साईधाम रिकामी झाली असली तरी तेथे आजूबाजूला इमारती व मोठी गाडी जाण्याचा मार्गच नसल्याने ती तोडायची कशी, असा प्रश्न पालिकेला पडला आहे. मीरा रोडच्या प्रभाग समिती क्रमांक-५ मधील तेहमीना या इमारतीत रहिवासी आहेत. तर, चंदे्रश टॅरेसचे रहिवासी उच्च न्यायालयात गेले असून सुरूपी गुलशन इमारतीला दुरुस्तीची परवानगी दिली आहे. समिती क्रमांक-६ च्या हद्दीत मीरा धाम सी, जी व एच अशा तीन इमारती धोकदायक असल्या तरी त्या रिकाम्या आहेत. जागेचा वाद, परवानगी मिळण्यात असलेली अडचण यामुळे शहरात धोकादायक म्हणून तोडलेल्या अनेक इमारतींचे रहिवासी तर बेघर झाले आहेत. पुनर्विकास कधी होणार, याची शाश्वती नसल्याने रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार होत नाहीत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात पालिका व नेते अपयशी ठरले आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून मिळालेल्या घरांमध्ये काहींना पर्यायी घरेभाड्यांनी दिली असली तरी त्यांची संख्यादेखील नाममात्र आहे.