शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

नऊ धोकादायक इमारतींवर कारवाई

By admin | Updated: March 13, 2016 02:33 IST

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या २८ धोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत नऊ इमारतीच तोडल्या आहेत. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात तर तीन इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे

मीरा रोड : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या २८ धोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत नऊ इमारतीच तोडल्या आहेत. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात तर तीन इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे. धोकादायक झालेल्या नऊ इमारतींमध्ये आजही रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. मार्चअखेर या इमारती रिकाम्या करून जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. भार्इंदर व मीरा रोडमध्ये ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या काळात दाटीवाटीने वसलेल्या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. पालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. तरीही, प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. इमारतींना नोटिसा बजावण्याशिवाय काहीच होत नसे. यातूनच इमारत वा भाग कोसळून गेल्या काही वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. खारीगावातील लता इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सर्वात जास्त होती.लतासह मुंबई, ठाण्यात धोकादायक इमारती कोसळल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने धोकादायक इमारती रिकाम्या करून तोडण्याची कारवाई काही अंशी सुरू केली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पालिकेने २८ धोकदायक इमारती जाहीर केल्या होत्या. त्यातील नऊ इमारती तोडण्यात आल्या. तीन इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालानंतर दुरुस्तीची परवानगी देण्यात आली. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात आहे. तर, नऊ इमारतींमध्ये आजही रहिवासी राहत आहेत. तर, चार इमारती रिकाम्या असून तोडण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. वास्तविक, पावसाळ्याच्या आधीच या सर्व इमारती पाडणे आवश्यक होते. दुसरा पावसाळा तोंडावर आला असताना पालिका पुन्हा जागी झाली आहे. एप्रिलमध्ये पालिकेला धोकादायक इमारतींची यादी जाहीर करावी लागणार आहे. भार्इंदर पश्चिम प्रभाग समिती-१ मध्ये फिलोमीना गोम्स यांचे घर धोकादायक ठरवले आहे. आयुक्तांनी ते १९ मार्चपर्यंत तोडण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिमेस प्रभाग समिती-२ मध्ये तीन मजली उषाकिरण व गजानन निवास या धोकादायक इमारती असून गजानन निवासचे प्रकरण न्यायालयात आहे. भार्इंदर पूर्वेतील प्रभाग समिती क्रमांक-३ मध्ये डिव्हाइन शॅरेटॉन प्लाझा या इमारतीमध्ये रहिवासी राहतात. तर, समिती क्रमांक-४ मधील कल्याण कॉटेज, केतकी निवास, राजीव अपार्टमेंट, साई मंगलम व वेतोस्कर विहार या पाच धोकादायक इमारतींत नागरिक राहतात. यातील कल्याण कॉटेजचे प्रकरण न्यायालयात आहे. राजीव अपार्टमेंटची आयआयटीने तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. तर, साईधाम रिकामी झाली असली तरी तेथे आजूबाजूला इमारती व मोठी गाडी जाण्याचा मार्गच नसल्याने ती तोडायची कशी, असा प्रश्न पालिकेला पडला आहे. मीरा रोडच्या प्रभाग समिती क्रमांक-५ मधील तेहमीना या इमारतीत रहिवासी आहेत. तर, चंदे्रश टॅरेसचे रहिवासी उच्च न्यायालयात गेले असून सुरूपी गुलशन इमारतीला दुरुस्तीची परवानगी दिली आहे. समिती क्रमांक-६ च्या हद्दीत मीरा धाम सी, जी व एच अशा तीन इमारती धोकदायक असल्या तरी त्या रिकाम्या आहेत. जागेचा वाद, परवानगी मिळण्यात असलेली अडचण यामुळे शहरात धोकादायक म्हणून तोडलेल्या अनेक इमारतींचे रहिवासी तर बेघर झाले आहेत. पुनर्विकास कधी होणार, याची शाश्वती नसल्याने रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार होत नाहीत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात पालिका व नेते अपयशी ठरले आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून मिळालेल्या घरांमध्ये काहींना पर्यायी घरेभाड्यांनी दिली असली तरी त्यांची संख्यादेखील नाममात्र आहे.