शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भिवंडीत रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Updated: February 11, 2017 03:50 IST

भिवंडी आगारातील बसचालकास मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकां विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल केला नाही

भिवंडी : भिवंडी आगारातील बसचालकास मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकां विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आगारातील कर्मचाऱ्यांमधील असंतोष कायम आहे. दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार ठाणे आरटीओचे पथक शुक्रवारी दुपारी आले आणि त्यांनी ६६ रिक्षांवर कारवाई केली. बसचालक प्रभाकर गायकवाड यांचा रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याचे पडसाद ठाण्यासह राज्यातील १२ आगारात उमटले. निजामपूर पोलिसांनी गायकवाड यांच्या मृत्यूची अकस्मात नोंद केल्याने आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. मुजोर रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारे पत्र आगारप्रमुख वाय.डी.खोडे यांनी निजामपूर पोलिसांना दिले आहे अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाणे आरटीओला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे आरटीओने दुपारपासून कारवाईला सुरूवात केली. बस आगारासमोर उभ्या असलेल्या रिक्षातील प्रवाशांना उतरवून रिक्षांच्या कागदपत्राची तपासणी केली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.एन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करीत जप्त केलेल्या रिक्षा बस कार्यशाळेत ठेवल्या. शहरातील रिक्षातळ,नल्ला रिक्षा ,खाजगी वाहने व कारवाई केलेल्या रिक्षांचे सांगाडे या बाबत शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)