शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठाण्यातील तीन हॉटेलवर कारवाई!

By जितेंद्र कालेकर | Updated: October 18, 2023 21:44 IST

या कारवाईने बड्या हॉटेल तसेच उपहारगृह चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे: स्वयंपाकगृहातील अस्वच्छतेसह अन्न पर्दाांची हाताळणी करणारे कामगार संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असलेल्याचा तपासणी अहवाल नसणे, पिण्यायोग्य पाणी न ठेवणे, पार्सल आणि विक्रीसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यासह अनेक त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या ठाण्यातील गजानन वडापाव, बिर्याणी कबाब करी आणि भिवंडीच्या गोरसईतील दिल्ली दरबार ढाबा या तीन हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने सील बंद करण्याची कारवाई बुधवारी केली आहे. या कारवाईने बड्या हॉटेल तसेच उपहारगृह चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे यांच्या पथकाने ठाण्यातील वंदना सिनेमागृहाजवळील ओम साईराम फूडस यांच्या बिर्याणी कबाब करी या हॉटेलवर १८ ऑक्टोबर रोजी अचानक धाड टाकली. या धाडीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. याठिकाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला नसणे, अन्न पदार्थांची विक्री करतांना, कच्च्या पदार्थांची हाताळणी करणाऱ्या कामगारांचे संसर्गजन्य, त्वचारोग किंवा तशाच आजारांपासून मुक्त असल्याचा वैद्यकीय दाखला नसणे, अन्न पदार्थांची खरेदी विक्री बिले नसणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशा ३१ त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत. 

असाच प्रकार सदानंद भालेकर यांच्या ‘राजमाता वडापाव’ या राममारुती रोडवरील उपहारगृहातही आढळला. याठिकाणी वडाभाव बनविण्यासाठी तयार केलेली चटणी, कांदा भजी आदी साहित्य उघड्या भांडयात ठेवल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीचा दाखला नसणे, पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला नसणे, स्वयंपाकगृहातील अस्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल केल्याचे बिल नसणे अशा २७ त्रुटी याठिकाणीही आढळल्या. त्यामुळे हे दोन्ही हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले.

भिवंडीतील दिल्ली दरबारमध्येही अनियमितताभिवंडीतील ‘दिल्ली दरबार’ या ढाब्यावरही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. योग्य शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्तीकडे पर्यवेक्षक पदी नेमणूक नसणे, पाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला नसणे, कामगारांची आरोग्य तपासणीचा दाखला नसणे, स्वच्छतेचा नियमांना हारताळ फासणे आणि पेस्ट कंट्रोल केल्याचा अहवाल नसणे अशा त्रुटी याठिकाणच्या तपासणीत आढळल्या. त्यामुळे हा ढाबा बंद करण्याची नोटीस अन्न सुरक्षा अधिकारी ए. जे. वीरकायदे यांनी बजावली आहे. या तिन्ही हॉटेलांवरील कारवाईने अन्न पदार्थांची नियमांना हारताळ फासून विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि उपहारगृह चालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :thaneठाणे