शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

उल्हासनगरातील रस्ता कोंडी करणाऱ्यावर कारवाई; २ तासात ४८ हजाराची दंडात्मक वसुली

By सदानंद नाईक | Updated: May 19, 2023 15:17 IST

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या शांतीनगर वेलकम गेट ते महापालिका कल्याण अंबरनाथ रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरवारी धडक कारवाई केली. विभागाच्या २ तासाच्या कारवाईत ४८ हजाराचा दंड वसूल केला असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. 

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, पोलीस कर्मचारी यांनी गुरवारी दुपारी बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनावर संयुक्त कारवाई केली. त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 

महापालिकेच्या या धडक कारवाईनंतर रस्त्यावर असेच वाहने बेकायदा पार्किंग केलेली असल्यास पुन्हा कारवाईचे संकेत दिले. व्यापारी दुकाना समोरील पदपथावर लोखंडी जाळी तसेच दुकानातील साहित्य ठेवत असल्याने, नागरिकांना जाण्यास अडथळा निर्माण झाला. काही व्यापारी रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने विक्रीस ठेवत असल्याने, अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या गाडी खाली केरकचरा साठून स्वच्छतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकली आहे. अश्यावर कारवाई होणार असल्याचे अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर