शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

स्वानुभावातून ‘समतोल’ साधत ते दाम्पत्य देतेय इतरांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

स्नेहा पावसकर ठाणे : प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना मनासारखे शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून घर सोडून मुंबई गाठली, पण येथेही ...

स्नेहा पावसकर

ठाणे : प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना मनासारखे शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून घर सोडून मुंबई गाठली, पण येथेही कोणाचा भक्कम आधार न मिळाल्याने ते पुन्हा गावाकडे वळले. मात्र आपल्याप्रमाणेच घर सोडून मुंबईत विविध कारणांनी येणाऱ्या निराधार मुलांचे काय होत असेल, आपल्यासारखे त्यांचे हाल होऊ नये हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता होता आणि त्यातूनच आपणच त्यांचा आधार व्हायचे ठरवले. विविध संस्थांसोबत काम करून शिकले आणि ज्यांनी समतोल फाउंडेशनची स्थापना केली ती व्यक्ती म्हणजे विजय जाधव. आज घर सोडून पळालेल्या आणि रेल्वेस्थानकावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनाचे संपूर्ण कार्य विजय आणि त्यांच्या पत्नी गीता हे समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून करतात.

ठाण्यातील समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाध‌व यांची ही गोष्ट. घरची परिस्थिती अगदी हलाखीची. मात्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना चौथीची स्कॉलरशिप मिळाली. आणि त्याच आधारावर त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. जुन्नर येथील गावातून मुंबईत नोकरीसाठी आले. काहीकाळ उमेदी केली. पण कोणाचा भक्कम आधार मिळत नव्हता. अखेर पुन्हा गावी जाऊन त्यांनी निराधार, हरवलेल्या मुलांसाठी काम करायचे ठरवले आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. स्वत: मागास समाजातील असल्याने घरात तसे समाजसेवेचे काम करण्याबाबत पोषक वातावरण नव्हते. मात्र त्यांनी घरच्यांचा विराेध पत्करत हे काम सुरू ठेवले.

दरम्यानच्या काळात गीता यांच्यासोबत विजय यांचे लग्न झाले. विजय हे स्टेशनवर हरवलेल्या मुलांसाठी देणगी किंवा मदत मागून सुरुवातीला काम करायचे. ते गीता यांच्या घरच्यांना पटत नव्हते. विजय यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवसही भीक मागणाऱ्या १०० मुलांसोबत साजरा केला. हा सगळा प्रकार गीता यांच्या माहेरच्यांना वेगळा वाटायचा. ते गीता यांना काही काळासाठी माहेरी घेऊन गेले. मात्र तरीही विजय यांचे समाजसेवेचे कार्य अविरत सुरू होते. कालांतराने त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कार मिळू लागले तेव्हा गीता यांच्या माहेरच्या मंडळींनाही या कामाचा हेवा, कौतुक वाटू लागले आणि गीता या पुन्हा विजय यांच्यासोबतीने काम करू लागल्या. आज समतोल फाउंडेशनच्या कार्यात गीता या विजय यांच्याही पुढे असतात. हरवलेल्या मुलांचे पुनर्वसन होईपर्यंत व्हॉलंटिअर्सच्या साथीने गीता या मुलांचा आईप्रमाणेच सांभाळ करतात.

-------