शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वानुभावातून ‘समतोल’ साधत ते दाम्पत्य देतेय इतरांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

स्नेहा पावसकर ठाणे : प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना मनासारखे शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून घर सोडून मुंबई गाठली, पण येथेही ...

स्नेहा पावसकर

ठाणे : प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना मनासारखे शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून घर सोडून मुंबई गाठली, पण येथेही कोणाचा भक्कम आधार न मिळाल्याने ते पुन्हा गावाकडे वळले. मात्र आपल्याप्रमाणेच घर सोडून मुंबईत विविध कारणांनी येणाऱ्या निराधार मुलांचे काय होत असेल, आपल्यासारखे त्यांचे हाल होऊ नये हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता होता आणि त्यातूनच आपणच त्यांचा आधार व्हायचे ठरवले. विविध संस्थांसोबत काम करून शिकले आणि ज्यांनी समतोल फाउंडेशनची स्थापना केली ती व्यक्ती म्हणजे विजय जाधव. आज घर सोडून पळालेल्या आणि रेल्वेस्थानकावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनाचे संपूर्ण कार्य विजय आणि त्यांच्या पत्नी गीता हे समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून करतात.

ठाण्यातील समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाध‌व यांची ही गोष्ट. घरची परिस्थिती अगदी हलाखीची. मात्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना चौथीची स्कॉलरशिप मिळाली. आणि त्याच आधारावर त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. जुन्नर येथील गावातून मुंबईत नोकरीसाठी आले. काहीकाळ उमेदी केली. पण कोणाचा भक्कम आधार मिळत नव्हता. अखेर पुन्हा गावी जाऊन त्यांनी निराधार, हरवलेल्या मुलांसाठी काम करायचे ठरवले आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. स्वत: मागास समाजातील असल्याने घरात तसे समाजसेवेचे काम करण्याबाबत पोषक वातावरण नव्हते. मात्र त्यांनी घरच्यांचा विराेध पत्करत हे काम सुरू ठेवले.

दरम्यानच्या काळात गीता यांच्यासोबत विजय यांचे लग्न झाले. विजय हे स्टेशनवर हरवलेल्या मुलांसाठी देणगी किंवा मदत मागून सुरुवातीला काम करायचे. ते गीता यांच्या घरच्यांना पटत नव्हते. विजय यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवसही भीक मागणाऱ्या १०० मुलांसोबत साजरा केला. हा सगळा प्रकार गीता यांच्या माहेरच्यांना वेगळा वाटायचा. ते गीता यांना काही काळासाठी माहेरी घेऊन गेले. मात्र तरीही विजय यांचे समाजसेवेचे कार्य अविरत सुरू होते. कालांतराने त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कार मिळू लागले तेव्हा गीता यांच्या माहेरच्या मंडळींनाही या कामाचा हेवा, कौतुक वाटू लागले आणि गीता या पुन्हा विजय यांच्यासोबतीने काम करू लागल्या. आज समतोल फाउंडेशनच्या कार्यात गीता या विजय यांच्याही पुढे असतात. हरवलेल्या मुलांचे पुनर्वसन होईपर्यंत व्हॉलंटिअर्सच्या साथीने गीता या मुलांचा आईप्रमाणेच सांभाळ करतात.

-------