शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून बांगलादेशात पसार झालेला आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:28 IST

पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून या पथकाने त्याला ३१ डिसेंबर रोजी अटक केली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईपालघरच्या वालीव पोलिसांच्या केले हवालीमृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत दिला होता फेकून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकून बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख (४५, रा. बांगलादेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्याला पालघरच्या वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, कैलास सोनवणे, हवालदार मोरे, रवींद्र पाटील आणि नरसिंग महापुरे आदींच्या पथकाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात सॅटिसखाली सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याने डिसेंबर २०१७ मध्ये त्याची पत्नी पॉली हिचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून तो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तातिवली खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकला होता, अशी कबुलीही त्याने या पथकाला दिली. विशेष म्हणजे त्याने केलेल्या खुनानंतर त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचा सांगाडा दोन वर्षांनी म्हणजे २१ मार्च २०१९ रोजी पालघरच्या वालीव पोलिसांना मिळाला. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्याला आता वालीव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.........................निकेत कौशिक यांनी दिले होते आदेशगेल्या तीन वर्षांतील खून आणि मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी दिले होते. पालघरमध्ये २०१७ मधील दोन, २०१८ मधील सहा आणि २०१९ मधील आठ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. ठाणे शहर पोलिसांमुळे आता २०१७ मधील दोनपैकी एका खुनाचा छडा लागल्यामुळे आता ही संख्या एकवर आली आहे. तर ठाणे ग्रामीणमधील गेल्या तीन वर्षांतील १४ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचेही आदेश कौशिक यांनी दिले होते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून