शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बिहारमधून पळालेला तिहेरी हत्याकांडातील आरोपी ठाण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:23 IST

बिहारच्या जेलमधून दुसऱ्यांदा पसार झालेल्या तिहेरी हत्याकांडातील प्रजितकुमार सिंह (४०, रा. इंद्रागाछी, जि. चंम्पारण, बिहार) या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्यावर बिहारच्या पोलीस महासंचालकांनी २५ हजारांचे बक्षीसही ठेवले होते.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईदुसऱ्यांदा केली अटक२५ हजारांचे होते बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तिहेरी हत्यांकांडामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना बिहारच्या जेलमधून दोन वेळा पसार झालेल्या कुख्यात प्रजितकुमार सिंह (४०, रा. इंद्रागाछी, जि. चंम्पारण, बिहार) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. त्याला ठाण्यातील नौपाडा भागातील बी केबिन परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रजितकुमार हा ठाण्याच्या नौपाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सापळा लावून त्याला २६ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याचे वास्तव्य मुंबई आणि ठाणे परिसरात असल्याची माहिती बिहार येथील पश्चिम चंपारण, बेतिया येथील पोलीस अधीक्षकांकडून २५ मार्च २०२० रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. त्याला यापूर्वीही डिसेंबर २०१८ मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली होती. त्याने १८ एप्रिल १९९८ रोजी एकाच कुटूंबातील तिघांना जागीच ठार केले होते. याच तिहेरी हत्याकांडाबद्दल त्याला न्यायालयाने अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला २७ जानेवारी २०२० रोजी बिहारच्या बेतिया न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात असतांना त्याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले होले. त्याला लवकरच बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली........................................२५ हजारांचे होते बक्षीसप्रजितकुमार हा बिहारच्या बक्सर कारागृहात शिक्षा भोगत असतांना काही वर्षांपूर्वी त्याच्या दोन भावांचा अपघातात मृत्यू झाला. हा प्रकार त्याच्या जुन्या शत्रूंनी केल्याचा गैरसमज करून त्याने बक्सरच्या तुरु ंगातून इतर चार आरोपींसह पलायन केले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०१६ रोजी बक्सर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या काळात त्याने भोसकलेल्या कुटूंबियांकडून १० लाखांची खंडणी त्याने मागितली. खंडणीप्रकरणी त्याच्याविरुद्ध १४ नोव्हेंबर २०१८ रोजी कालीबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नेपाळ, दिल्ली, कलकत्ता, गुजरात, नाशिक आणि मुंबई असा प्रवास करीत ठाण्यात येऊन पोहचलेल्या सिंगला गुन्हे शाखेच्या युनिट एकने डिसेंबर २०१८ मध्ये अटक केली होती. आताही त्याच्यावर बिहारच्या पोलीस महासंचालकांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले असतांना सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अविराज कुराडे, संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, जमादार उदय देसाई, पोलीस हवालदार नरसिंग महापुरे, अबुतालीब शेख, शिवाजी गायकवाड, आनंदा भिलारे, पोलीस नाईक चंद्रकांत वाळूंज, विक्रांत कांबळे, रिझवान सैय्यद, अमोल देसाई, राहूल पवार आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने त्याला पुन्हा २६ मार्च रोजी अटक केली.

 

 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक