शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खून प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरुन कोयत्याने वार करुन जयराम जानू कव्हा (५८, रा. उंबरखेडा, जि. पालघर) ...

ठळक मुद्देठाणे सत्र न्यायालयाचे आदेशपालघर जिल्हयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरुन कोयत्याने वार करुन जयराम जानू कव्हा (५८, रा. उंबरखेडा, जि. पालघर) याचा खून करणाऱ्या हेमंत मोरघा या आरोपीला दहा वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी बुधवारी सुनावली आहे. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे ही शिक्षा सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन वर्षापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जव्हारमधील उंबरखेडा गावातील रहिवाशी हेमंत हा २९ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावातील जयराम कव्हा यांच्या घरासमोरील अंगणात उभा होता. त्यावेळी तो कोयत्याने स्वत:ची जीभ कापण्याचा प्रयत्न करीत होता. तेंव्हा जयराम यांनी जीभ का कापतो, वेड्यासारखा का करतो? असे त्याच्याजवळ जाऊन त्याला सुनावले. याचाच राग हेमंतला आला. त्याने या रागाच्या भरात कोयत्याने जयराम यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन जव्हार पोलिसांनी हेमंतला अटकही केली. पोलिसांनी कलम ३०२ अन्वये हेमंतविरु द्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. परंतू, आरोपीचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे न्यायाधीश जोशी यांनी कलम ३०४ भाग एक या कलमाखाली त्याला दोषी ठरवून दहा वर्ष कारावास आणि दोन हजार रु पये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे उज्वला मोहोळकर यांनी तर तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक घनशाम आढाव यांनी काम पाहिले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयMurderखून