शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ठाण्यात अपघातग्रस्त रिक्षाला आग; रिक्षात अडकून महिलेचा जागीच मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Updated: May 3, 2023 17:21 IST

पेट घेतलेल्या रिक्षाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने सुरू केले.

ठाणे: रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात रिक्षाने अचानक पेट घेतला. त्याचवेळी त्या रिक्षामध्ये अडकलेल्या अनोळखी महिला प्रवाशाचा  जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक राजेश कुमार यादव (४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख पोलीस चौकीजवळ घडली. मृत पावलेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे  कासारवडवली पोलिसांनी सांगितले. 

रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवाशी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने  ठाण्याकडे एक महिला प्रवासी घेऊन येत होता. त्यावेळी यादव याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या मधील बाजूस असलेल्या दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात रिक्षाला आग लागली. त्यावेळी ती महिला त्यामध्ये अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर यादव गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कासारवडवली पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. पेट घेतलेल्या रिक्षाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने सुरू केले. मात्र रिक्षात अडकलेल्या महिलेला त्यांना वाचविण्यात यश आले नाही. त्या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून ती ठाण्यात पहाटेच्या दरम्यान बैंगलोर येथून आलेल्या रेल्वेतून उतरल्याचे सीसीटीव्हीतील फूटेजद्वारे उघड झाल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचा इतका भडका कसा झाला ? याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.

टॅग्स :thaneठाणे