शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

ठाण्यात ‘अपघातमुक्त दहीहंडी’ उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:34 IST

हीहंडीच्या उंचीपासून अनेक निर्बंधांचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने उंचीवरील गेली दोन वर्षे असलेली बंधने शिथील होणार असल्याने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहीहंडीच्या उंचीपासून अनेक निर्बंधांचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने उंचीवरील गेली दोन वर्षे असलेली बंधने शिथील होणार असल्याने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र थरांचा थरार अनुभवतानाच यंदाची दहीहंडी ही अपघातमुक्त असेल, असा निर्धार पथकांनी बोलून दाखवला. दहीहंडीवर न्यायालयाकडून घालण्यात आलेले वय आणि उंचीचे निर्बंध जाचक वाटू लागल्याने काही गोविंदा पथकांनी राज्य शासनाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. आता सोमवारी उच्च न्यायालयाने उंची व गोविंदांच्या वयाबाबतचे निर्बंध राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनात निश्चित करावेत, असे आदेश दिल्याने सरकार दिलासा देईल व गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त उंचीचे थर लावता येतील, अशी आशा निर्माण झाल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले.सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १४ वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही. याशिवाय दहीहंडीची उंची किती असावी याचा निर्णयही सरकार आणि विधिमंडळाने घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे ठाण्यातील गोविंदा पथकांनी जल्लोषात स्वागत केले. निर्णय गोविंदा पथकांच्या बाजूने लागेल अशी सुरूवातीपासूनच आशा होती असे त्यांनी सांगितले. उंचीवरचे निर्बंध हायकोर्टाने उठवले असले तरी नऊ थरांचे मनोरे रचण्याऐवजी जितका सराव झाला तितकेच थर रचू असे काही गोविंदा पथकांनी सांगितले. दोन मुख्य अटींच्या संदर्भात हायकोर्टाने सकारात्मक निर्णय दिला आहे. हा निर्णय आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. दोन वर्षे दिलेला लढा अखेर यशस्वी झाला. त्यामुळे यावर्षी त्याच उत्साहात दहीहंडी साजरी करणार असे ‘महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समिती’चे सचिव समीर पेंढारे यांनी सांगितले. जितका सराव झाला आणि जितकी क्षमता तितकेच थर लावा, अपघात होणार नाही याची काळजी घ्या. यंदा अपघातमुक्त उत्सव साजरा करु असे आवाहन तमाम गोविंदा पथकांना समन्वय समितीने केले आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही सर्व गोविंदा खूष आहोत. आधीपासूनच वाटत होते की निकाल आमच्या बाजूने लागेल. आम्ही सराव सुरू केला नव्हता पण आजपासून जोशात सराव करणार. सात थर तरी यंदा नक्कीच रचणार.- राकेश यादव, ठाण्याचा राजा गोविंदा पथकआम्ही गुरूपौर्णिमेपासून सराव सुरू केला. या निर्णयामुळे खूप आनंद झाला. सरावाचा वेग आणखीन वाढवणार. यंदा सात थर नक्की लावू.- निलेश वैती, जतन गोविंदा उत्सव पथकहा निर्णय आनंद देणारा असला तरी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केल्यास महिला गोविंदा उत्साहात स्पर्धेत उतरतील. सहा ते सात थर लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.- महेंद्र नाईक, प्रशिक्षक, संकल्प महिला गोविंदा पथकआम्ही हा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करणार, कोणताही धांगडधिंगा नसेल. गेल्यावर्षी उत्सवाबाबत जी आमची भूमिका होती तीच यावर्षीही असेल. यंदा आमच्या इथे नऊ थर लागणार. गोविंदांच्या सर्व सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. आमच्या उत्सवाची सुरूवात ही झेंडावंदनाने करणार.- अविनाश जाधव, आयोजक, मनसे ठाणे शहर दहीहंडी