शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

भाईंदरच्या डोंगरी - उत्तन मार्गावर विहीरीलगत खचलेल्या रस्त्यामुळे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 20:25 IST

महापालिका बळी जाण्याची वाट पाहतेय का ? नगरसेवकांचा सवाल

मीरारोड - भार्इंदरच्या डोंगरी - उत्तन मार्गावर असलेल्या भल्या मोठ्या विहरी जवळचा रस्ता गेल्या वर्षी जुलै मध्ये खचुन सतत अपघात होत असताना देखील मीरा भार्इंदर महापालिके कडुन मात्र अजुनही दुरुस्ती काम हाती घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर उत्तन सागरी पोलीस देखील अपघाताच्या नोंदी करुन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी या भोंगळ व बेजबाबदार कारभारा विरुध्द संताप व्यक्त करत प्रशासन लोकांचे बळी जाण्याची वाट पाहतेय का ? असा सवाल केला आहे. आज रवीवारी पहाटे एका मोटार कारला भिषण अपघात झाला व आतील प्रवासी जखमी झाले.गेल्या वर्षी १ जुलै रोजी भार्इंदरच्या डोंगरी खदानी समोर असलेल्या जुन्या मोठ्या विहिरी लगतचा रस्ता खचला होता. सदर रस्ता खचल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणुन दिल्याने त्यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. त्या नंतर पालिकेने रस्ता खचला त्या ठिकाणी लोखंडी खांब उभे केले जेणे करुन वाहन विहरीत पडु नये. भार्इंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे. शिवाय एस्सेलवर्ल्ड, ज्युडिशीयल अकादमी, केशवसृष्टी साठी सुध्दा वाहनाने जाण्यास हाच रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असली तरी डोंगरी ते आनंद नगर र्पयत रस्ता तसा अरु ंदच आहे.येथून कचरा वाहुन नेणारे डंपर, परिवहन सेवेच्या बस , डंपर आदी अवजड वाहने देखील भरधाव जात असतात. शिवाय गेल्या वर्षी पावसाळा सुरु झाला तेव्हा आनंद नगर येथील रस्त्या लगत असलेल्या तलावाची कुंपण भिंत कोसळली . भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत असल्याने तेथे देखील खांब लावले. विहरी कडे खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी लोखंडी खांब पालिकेने लावले पण वाहनांची संख्या व वेग पाहता या ठिकाणी गतीरोधक बसवले नाहित, सुरक्षेच्या अनुषंगाने ब्लिंकर, वीज दिवे आदी बसवले नाहित.लोखंडी खांब रात्री वा पहाटेच्या वेळी लक्षात येत नसल्याने आज रवीवार १ मार्च रोजी पहाटे एका मोटार कारने येथील लोखंडी खांबास जबर धडक दिली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच आतील प्रवाशांना लागले असे त्यावेळी ये - जा करणाराया लोकां कडुन सांगण्यात आले. परंतु उत्तन सागरी पोलीस ठाण्याने मात्र या अपघाताची नोंद घेऊन बेदरकार वाहन चालवणाराया चालका विरुध्द कारवाईच केली नसल्याचा संताप लोकंनी व्यक्त केला आहे. काही दिवसां पुर्वी भारत सरकार असे लिहलेली मोटार येथील खांबाला रात्रीची धडकल्याने मोठा अपघात झाला होता. पण त्या बाबत देखील पोलीसांनी कारवाई केली नसल्याचे सुत्रांनी सांगीतले. त्यामुळे पालिकेसह पोलीसांची भुमिका देखील बेजबाबदारपणाची असल्याचा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.४९ वर्षां पूर्वी ९ जुलै १९७० रोजी रात्री साडे आठच्या सुमारास एसटी बस येथील विहरीत पडून भीषण दुर्घटना घडली होती . त्या मध्ये ९ प्रवाश्याना आपले प्राण गमवावे लागले होते . आधीच येथील तलावाची अर्धी भिंत यंदाच्या पावसात पडली असून आता येथील विहरी लगतचा रस्ता खचल्याने ग्रामस्थांना ४९ वर्षां पूर्वीच्या झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणींनी झोप उडवली आहे . परंतु महापालिका मात्र रस्त्याचे बांधकाम व संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास गेल्या वर्षा पासुन टाळटाळ करत असल्याने मोठा अपघात होऊन लोकांचे बळी जाण्याची वाट पहात आहेत का ? असा संताप स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद व एलायस बांड्या सह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.