शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:17 IST

शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे.

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र, ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत. वेळेत आॅनलाइन अर्ज करूनही प्रवेशासाठी वेठीस धरले जात असल्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये २५ टककयांमधील १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यातील पाच हजार ७०२ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवडले. मात्र, त्यातील तीन हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. १५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिजेक्ट करण्यात आले, तर उर्वरित एक हजार ६४६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेतलेला नसल्याचे आढळून आले. यातील येथील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने सुमारे २६ विद्यार्थ्यांना आजपर्यंतही प्रवेश दिले नाही. या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिल्याशिवाय दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी काढली जाणार नसल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.आरटीई या कायद्याखाली देण्यात येत असलेल्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी या सरस्वती शाळेत केवळ पाच जागा राखीव असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. परंतु, २८ जागा आरक्षित असल्याची नोंद शाळा प्रशासनाने आधीच केली, त्यानुसार लॉटरी सोडतद्वारे या शाळेसाठी सुमारे २६ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांना शाळेने अद्यापही प्रवेश दिला नाही. शुक्रवारी उपशिक्षणाधिकाºयांकडे सुनावणी झाली. त्यावर शाळा व्यवस्थापन आता काय निर्णय घेणार, त्यानंतर दुसºया फेरीच्या प्रवेशाची तयारी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया खाजगी शाळांमधील केजी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी आरटीईच्या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. यासाठी पालकांनी १० हजार ८३९ अर्ज आॅनलाइन दाखल केले. प्रवेश क्षमतेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. तरीदेखील दुसºया फेरीस विलंब होत असल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.>१६ हजारपैकी ५,७०२ प्रवेशजिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६, ५४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरक्षित आहेत. यापैकी केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना, तर पहिलीसाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवले.सरस्वती शाळेमुळे फटका : ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत.आजपर्यंत शाळांमध्ये झालेले प्रवेशशहर शाळा निवड प्रवेश रिजेक्टठाणे मनपा-१ ८० ३८६ २६८ १३ठाणे मनपा-२ ६३ ७५० ५१२ १३अंबरनाथ ५० ३७८ २०१ ०१केडीएमसी ७७ ६७७ ४७३ १६कल्याण ग्रामीण ४६ १७० १२७ ०९भिवंडी मनपा ३२ ८९१ ६२० ३७भिवंडी ग्रामीण २९ ३१ २२ ०९मीरा-भार्इंदर ९४ २८ ०८ ०३नवी मुंबई १०४ १८६० १२७७ ५४०उल्हासनगर १९ ३१३ २१३ ०४मुरबाड १५ ०७ ०७ ००शहापूर ३१ २११ १४७ ०७