शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:17 IST

शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे.

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र, ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत. वेळेत आॅनलाइन अर्ज करूनही प्रवेशासाठी वेठीस धरले जात असल्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये २५ टककयांमधील १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यातील पाच हजार ७०२ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवडले. मात्र, त्यातील तीन हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. १५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिजेक्ट करण्यात आले, तर उर्वरित एक हजार ६४६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेतलेला नसल्याचे आढळून आले. यातील येथील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने सुमारे २६ विद्यार्थ्यांना आजपर्यंतही प्रवेश दिले नाही. या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिल्याशिवाय दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी काढली जाणार नसल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.आरटीई या कायद्याखाली देण्यात येत असलेल्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी या सरस्वती शाळेत केवळ पाच जागा राखीव असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. परंतु, २८ जागा आरक्षित असल्याची नोंद शाळा प्रशासनाने आधीच केली, त्यानुसार लॉटरी सोडतद्वारे या शाळेसाठी सुमारे २६ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांना शाळेने अद्यापही प्रवेश दिला नाही. शुक्रवारी उपशिक्षणाधिकाºयांकडे सुनावणी झाली. त्यावर शाळा व्यवस्थापन आता काय निर्णय घेणार, त्यानंतर दुसºया फेरीच्या प्रवेशाची तयारी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया खाजगी शाळांमधील केजी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी आरटीईच्या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. यासाठी पालकांनी १० हजार ८३९ अर्ज आॅनलाइन दाखल केले. प्रवेश क्षमतेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. तरीदेखील दुसºया फेरीस विलंब होत असल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.>१६ हजारपैकी ५,७०२ प्रवेशजिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६, ५४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरक्षित आहेत. यापैकी केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना, तर पहिलीसाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवले.सरस्वती शाळेमुळे फटका : ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत.आजपर्यंत शाळांमध्ये झालेले प्रवेशशहर शाळा निवड प्रवेश रिजेक्टठाणे मनपा-१ ८० ३८६ २६८ १३ठाणे मनपा-२ ६३ ७५० ५१२ १३अंबरनाथ ५० ३७८ २०१ ०१केडीएमसी ७७ ६७७ ४७३ १६कल्याण ग्रामीण ४६ १७० १२७ ०९भिवंडी मनपा ३२ ८९१ ६२० ३७भिवंडी ग्रामीण २९ ३१ २२ ०९मीरा-भार्इंदर ९४ २८ ०८ ०३नवी मुंबई १०४ १८६० १२७७ ५४०उल्हासनगर १९ ३१३ २१३ ०४मुरबाड १५ ०७ ०७ ००शहापूर ३१ २११ १४७ ०७