शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:17 IST

शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे.

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र, ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत. वेळेत आॅनलाइन अर्ज करूनही प्रवेशासाठी वेठीस धरले जात असल्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये २५ टककयांमधील १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यातील पाच हजार ७०२ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवडले. मात्र, त्यातील तीन हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. १५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिजेक्ट करण्यात आले, तर उर्वरित एक हजार ६४६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेतलेला नसल्याचे आढळून आले. यातील येथील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने सुमारे २६ विद्यार्थ्यांना आजपर्यंतही प्रवेश दिले नाही. या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिल्याशिवाय दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी काढली जाणार नसल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.आरटीई या कायद्याखाली देण्यात येत असलेल्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी या सरस्वती शाळेत केवळ पाच जागा राखीव असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. परंतु, २८ जागा आरक्षित असल्याची नोंद शाळा प्रशासनाने आधीच केली, त्यानुसार लॉटरी सोडतद्वारे या शाळेसाठी सुमारे २६ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांना शाळेने अद्यापही प्रवेश दिला नाही. शुक्रवारी उपशिक्षणाधिकाºयांकडे सुनावणी झाली. त्यावर शाळा व्यवस्थापन आता काय निर्णय घेणार, त्यानंतर दुसºया फेरीच्या प्रवेशाची तयारी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया खाजगी शाळांमधील केजी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी आरटीईच्या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. यासाठी पालकांनी १० हजार ८३९ अर्ज आॅनलाइन दाखल केले. प्रवेश क्षमतेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. तरीदेखील दुसºया फेरीस विलंब होत असल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.>१६ हजारपैकी ५,७०२ प्रवेशजिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६, ५४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरक्षित आहेत. यापैकी केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना, तर पहिलीसाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवले.सरस्वती शाळेमुळे फटका : ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत.आजपर्यंत शाळांमध्ये झालेले प्रवेशशहर शाळा निवड प्रवेश रिजेक्टठाणे मनपा-१ ८० ३८६ २६८ १३ठाणे मनपा-२ ६३ ७५० ५१२ १३अंबरनाथ ५० ३७८ २०१ ०१केडीएमसी ७७ ६७७ ४७३ १६कल्याण ग्रामीण ४६ १७० १२७ ०९भिवंडी मनपा ३२ ८९१ ६२० ३७भिवंडी ग्रामीण २९ ३१ २२ ०९मीरा-भार्इंदर ९४ २८ ०८ ०३नवी मुंबई १०४ १८६० १२७७ ५४०उल्हासनगर १९ ३१३ २१३ ०४मुरबाड १५ ०७ ०७ ००शहापूर ३१ २११ १४७ ०७