शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कळंबोलीत पाण्याचा गैरवापर

By admin | Updated: October 29, 2015 23:18 IST

कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.

तळोजा : कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. मुळात म्हणजे एका घरामागे एक पाण्याचे कनेक्शन असताना परिसरातील रहिवासी या कनेक्शनला १ एचपी, २ एचपीच्या मोटारी लावून पाणी वापरत आहेत. यामुळे घराच्या वर असलेल्या ३ मजल्यापर्यंत पाणी पुरवणे सोपे होते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरु असून यामुळे पाण्याचा गैरवापर होत आहे. शिवाय या ठिकाणाप्रमाणे कळंबोलीत काही ठिकाणी पाण्याच्या जोडणीला मीटर नसल्याने सिडकोकडून किरकोळ रुपयात पाणी मिळायचे. मात्र आता उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलेले आहे. या प्रकरणी सिडकोचे संजय भाटिया यांच्याकडे कळंबोली शहरातील या भागांचा लेखाजोखा पाणीपुरवठा विभागाने मांडला असून यावर लवकरच अंमलबजावणी होणार आहे. कळंबोली परिसरातील एलआयजी, केएल १, केएल २ या भागात सुमारे ६५ हजार लोकवस्ती असून यातील एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे मजले दिवसेंदिवस चढत आहेत, त्यामुळे या परिसरात सिडकोला गरजेपेक्षा अधिक पाणी द्यावे लागत आहे. त्या शिवाय पाणी ओढण्यासाठी मोटारीची स्पर्धा येथे लागत आहे. सिडकोच्या जलवाहिनीतला दाब कमी असल्याने या लोकांना त्याची गरज लागत आहे, मात्र आता या परिसराला मुबलक पाणी पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार असून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)