शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील येऊर मध्ये हॉटेल,बंगल्याना मुबलक पाणी ; मात्र आदिवासी पाडे पाण्याच्या टंचाईमुळे व्याकुळ 

By रणजीत इंगळे | Updated: May 29, 2023 19:02 IST

तब्ब्ल ९ दिवसांनी पाण्याचा टँकर येतो गावात

रणजीत इंगळे, ठाणे: स्मार्ट सिटी म्हणून ठाण्याची ओळख आहे.  हजारो कोटी रुपयांच्या विकास कामाची घोषणा ही नेहमी होत असते. दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या येऊर भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत आहे.  मुंबई आणि ठाण्याचा ऑक्सिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरमध्ये पिण्याच्या पाण्याची ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

तब्बल आठ दिवसानंतर पाण्याचा टँकर गावांमध्ये येत असल्याच नागरिक सांगतात. येऊन मध्ये अनधिकृत हॉटेल, बंगले यांना मात्र नियमित पाण्याचा पुरवठा होतो. एवढंच नाहीतर बंगल्यामध्ये गार्डन आणि रस्त्यावर देखील पाण्याचा फवारा मारतात पण आदिवासी बांधवाना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४०० हून अधिक दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराचे गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरिककरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत होता.

अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणी देण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेला भातसा धरणातून वाढीव पाणी दिले आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही शहराला वाढीव पाणी मंजुर केले. यामुळे शहरात आता दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागांत टंचाईची समस्या निर्माण होते. त्यापाठोपाठ डोंगर भागात असलेल्या येऊर मधील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. येऊर भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. पाटनोपाडा, जांभूळपाडा,धर्माचापाडा,देवाचा पाडा, वणीचापाडा या अनेक आदिवासीं पाड्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

"गेली ८ दिवस पाणी आलेच नाही. उन्हातान्हत पाण्यासाठी फिरावे लागत आहे. गेली आठवडाभर कोणाच्या घरात अंघोळ केली नाही. पाणी नसल्याने पाहुणे पण बोलवता येत नाही. सद्या लग्नसराईचे दिवस असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.. - राधिका सालकर ( आदिवासी ग्रामस्थ)

आम्ही स्थानिक असून पाण्यासाठी आम्हाला दुसऱ्याच्या दारात जावे लागत आहे. कुठलेतरी हॉटेल, ढाबे किंवा एखाद्या बंगल्याच्या मालकांना पिण्याच्या पाण्यासाठी विनवणी करावी लागते. त्यामूळे पालिका प्रशासनाने कमीत कमी पाण्याची सोय करावी आणि दररोज टँकर पाठवावा अशी मागणी आम्ही करत आहोत. - सुनील सुलकर ( आदिवासी ग्रामस्थ )

टॅग्स :thaneठाणे