शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ठाण्यातील येऊर मध्ये हॉटेल,बंगल्याना मुबलक पाणी ; मात्र आदिवासी पाडे पाण्याच्या टंचाईमुळे व्याकुळ 

By रणजीत इंगळे | Updated: May 29, 2023 19:02 IST

तब्ब्ल ९ दिवसांनी पाण्याचा टँकर येतो गावात

रणजीत इंगळे, ठाणे: स्मार्ट सिटी म्हणून ठाण्याची ओळख आहे.  हजारो कोटी रुपयांच्या विकास कामाची घोषणा ही नेहमी होत असते. दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या येऊर भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत आहे.  मुंबई आणि ठाण्याचा ऑक्सिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरमध्ये पिण्याच्या पाण्याची ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

तब्बल आठ दिवसानंतर पाण्याचा टँकर गावांमध्ये येत असल्याच नागरिक सांगतात. येऊन मध्ये अनधिकृत हॉटेल, बंगले यांना मात्र नियमित पाण्याचा पुरवठा होतो. एवढंच नाहीतर बंगल्यामध्ये गार्डन आणि रस्त्यावर देखील पाण्याचा फवारा मारतात पण आदिवासी बांधवाना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४०० हून अधिक दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराचे गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरिककरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत होता.

अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणी देण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेला भातसा धरणातून वाढीव पाणी दिले आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही शहराला वाढीव पाणी मंजुर केले. यामुळे शहरात आता दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागांत टंचाईची समस्या निर्माण होते. त्यापाठोपाठ डोंगर भागात असलेल्या येऊर मधील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. येऊर भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. पाटनोपाडा, जांभूळपाडा,धर्माचापाडा,देवाचा पाडा, वणीचापाडा या अनेक आदिवासीं पाड्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

"गेली ८ दिवस पाणी आलेच नाही. उन्हातान्हत पाण्यासाठी फिरावे लागत आहे. गेली आठवडाभर कोणाच्या घरात अंघोळ केली नाही. पाणी नसल्याने पाहुणे पण बोलवता येत नाही. सद्या लग्नसराईचे दिवस असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.. - राधिका सालकर ( आदिवासी ग्रामस्थ)

आम्ही स्थानिक असून पाण्यासाठी आम्हाला दुसऱ्याच्या दारात जावे लागत आहे. कुठलेतरी हॉटेल, ढाबे किंवा एखाद्या बंगल्याच्या मालकांना पिण्याच्या पाण्यासाठी विनवणी करावी लागते. त्यामूळे पालिका प्रशासनाने कमीत कमी पाण्याची सोय करावी आणि दररोज टँकर पाठवावा अशी मागणी आम्ही करत आहोत. - सुनील सुलकर ( आदिवासी ग्रामस्थ )

टॅग्स :thaneठाणे