शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

...अबब ३६ टक्के पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:24 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील वाढत्या लोकवस्तीकरिता पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने २८२ कोटी मंजूर केले.

पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील वाढत्या लोकवस्तीकरिता पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने २८२ कोटी मंजूर केले. त्यातील ८० टक्के खर्च करण्यात आहे. मात्र, असे असतानाही शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल ३६ टक्के पाणीगळती आहे. नव्याने योजना तयार केल्यास पाणीगळतीचे प्रमाण कमी होईल, असा दावा अधिकारी करत असले, तर यापूर्वी खर्च झालेला पैसा पाण्यात गेल्यात जमा आहे.अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १९२३ मध्ये उल्हास नदीवर बॅरेज धरण उभारून योजना कार्यान्वित केली गेली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची सध्याची लोकसंख्या ही सहा लाखांच्या घरात आहे. दोन्ही शहरांना दररोज १०६ दशलक्ष लीटर्स एवढा पाणीपुरवठा होत आहे. अंबरनाथमध्ये शहरी भागाकरिता दररोज ४७ दशलक्ष लीटर्स पाणी, तर आयुध निर्माण कारखान्यासाठी आठ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. म्हणजे दररोज ५५ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. उल्हासनदीतून सरासरी ४६ , एमआयडीसीकडून १० आणि चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लीटर्स असे एकूण ६२ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. मात्र, पाणी योजनेतील त्रुटीमुळे तब्बल २० दशलक्ष लीटर्स म्हणजे सरासरी ३६ टक्के पाण्याची गळती होते आहे. पाणीगळतीचा विचार करता अंबरनाथ शहराला १२ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरणाने आपल्या पाणीगळतीचे प्रमाण ३६ टक्क्यांवरून १५ ते २० टक्क्यांवर आणले, तरी शहराला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाने गळती रोखण्यासाठी ठोस उपाय योजलेले नाहीत. त्यामुळेच पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही पाणीसमस्येला तोंड देण्याची वेळ अंबरनाथकरांवर ओढवली आहे.बदलापूरचीही तीच अवस्था आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता शहराला दररोज ३४ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. उल्हासनदीतून तब्बल ४३ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. सरासरी नऊ दशलक्ष लीटर्स पाणी जास्तीचे उचलण्यात येत असले, तरी जीवन प्राधिकरणाने योजना अयोग्य पद्धतीने हाताळल्याने १२ दशलक्ष लीटर्स म्हणजे तब्बल ३६ टक्के पाणीगळतीचे प्रमाण ठेवले आहे. बदलापूरला गरजेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची गळती जास्त असल्याने शहराला तीन दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाण्याची गरज आहे. ही तूट भरून निघत नसल्याने शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अंबरनाथची पाणीपुरवठा योजना अपुरी : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेत सुसूत्रता यावी, यासाठी नगरोत्थान प्रकल्पांतर्गत ७७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. पाण्याची गळती जास्त असल्याने या योजनेत नवीन जलवाहिन्या आणि जलकुंभ प्रस्तावित केले होते. मात्र, ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. या योजनेला १३ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत काम पूर्ण झाले नाही, हेच या योजनेचे अपयश म्हणावे लागेल. पहिलीच योजना अपूर्णावस्थेत असताना शासनाने अमृत अभियानांतर्गत नव्याने ५७ कोटींची योजना मंजूर केली.२०१६ मध्ये या कामाचे आदेश दिले. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. या योजनेत नवीन जलवाहिन्या प्रस्तावित आहेत. मात्र, नवीन जलवाहिन्या टाकूनही पाण्याची गळती रोखता येत नसल्याने प्राधिकरणाचे नियोजन चुकत आहे, हे स्पष्ट होत आहे.कुळगाव-बदलापूर शहरांसाठी शासनाने नगरोत्थान योजनेतून ८१ कोटींची योजना मंजूर केली होती. त्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. नवीन जलवाहिन्या आणि जलकुंभ उभारण्यात आले. मात्र, तरीदेखील शहरातील पाणीगळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. मूळ योजना ही शहरातील टोकावरील भागांना पाणीपुरवठा करण्याबरोबर गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी तयार केली होती. मात्र, त्यात अपयश आले आहे. या योजनेतील अपयश समोर असतानाच अमृत अभियानांतर्गत नव्याने ६७ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतील जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील निकृष्ट झाल्याने या योजनेचे काम पूर्ण झाल्यावरही पाण्याची गळती कमी होईल, अशी अपेक्षा राहिलेली नाही. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असली, तरी दोन्ही शहरांची योजना ही जीवन प्राधिकरण सांभाळत आहे. जीवन प्राधिकरण पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ असले, तरी वितरण व्यवस्थेत अपयशी ठरल्याचे अंबरनाथ आणि बदलापुरात स्पष्ट दिसत आहे. दोन्ही शहरांसाठी २८० कोटींपेक्षा जास्तनिधी दिलेला असतानाही योजनेतून काहीच साध्यझालेले नाही. नवीन वस्त्यांना पाणीपुरवठा करत असताना अस्तित्वातील योजनेतील पाण्याची गळती मात्र रोखता आलेली नाही.