शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

देश सोडून जाण्यावरून आमिरवर टीका

By admin | Updated: November 25, 2015 01:41 IST

आमिर खान याने देशात असहिष्णुता वाढल्याने देश सोडून जाण्याची भाषा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. सरकारी जाहिरातीतून लोकांना अतुल्य भारताची ओळख करून

ठाणे : आमिर खान याने देशात असहिष्णुता वाढल्याने देश सोडून जाण्याची भाषा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. सरकारी जाहिरातीतून लोकांना अतुल्य भारताची ओळख करून देणाऱ्या आमिरला अचानक हा देश असहिष्णु कसा वाटू लागला व देश सोडून जाण्यासारखी टोकाची भाषा तो का करु लागला, असा येथील काही कलाकार व त्याचे चाहते करु लागले आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅपवर त्याला लक्ष्य केले गेले आहे.देशात असहिष्णुता माजली आहे. त्यामुळे माझी पत्नी किरण हिला मुलांना कसे सुरक्षित ठेवायचे याचीही भीती वाटत आहे ही आमिरने व्यक्त केलेली भीती शुद्ध वेडेपणा असल्याचे अभिनेता मोहन जोशी यांनी सांगितले. आमिर खानला जर भारतात भीती वाटते तर ज्या देशात सुरक्षित वाटते त्या देशात आजच्या आज रात्रीचे तिकीट काढावे आणि चालू पडावे. तो गेल्याने हिंदी चित्रपट सृष्टीला काहीही फरक पडणार नाही. असे कित्येक लोक येतात आणि जातात. भारताची लोकसंख्या करोडोंची आहे या सर्व लोकांना भीती वाटत नाही तर मर्सिडीज गाडीतून फिरणाऱ्या आमिर व शाहरूखला कशाची भीती वाटते असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला.देशात असहिष्णुता माजली असताना सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. त्याचे पडसाद म्हणून असह्यतेतून लेखकांनी पुरस्कार परत केले आहेत. हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे. आमिर खानला पुरस्कार परत करणे योग्य वाटते . हे त्याचे वैयक्तीक मत आहे, असे म्हणावे लागेल. परंतु भारत हा माझा देश आहे. तिथे जर काही गोष्टी योग्य घडत नसतील तर भारताबाहेर जाण्याची भाषा करणे योग्य नाही. देशात राहूनच परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत लेखक आनंद म्हसवेकर यांनी व्यक्त केले. आमिरला असे वाटणे फारच दुर्दैवी आहे. हे फारच नकारात्मक बोलणे आहे. आमिरसारख्या सेलीब्रेटीने असे बोलणे म्हणजे देशाची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे, असे मत दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केले.यापूर्वी भारतात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. निर्घृण हत्या झाल्या आहेत. तेव्हा आमिरला कधी असे वाटले का नाही? त्याचे हे विधान बेजबाबदार नागरिकाचे आहे, अशी टीका लेखक हृषीकेश कोळी यांनी केली.