शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दुर्दैवी! भिवंडीत आदिवासी पाड्यातील गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; रुग्णलयात पोहोचेपर्यंत बाळ दगावले

By नितीन पंडित | Updated: September 3, 2022 20:48 IST

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही दुर्दैवी घटना सर्वांसमोर आली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी:भिवंडी वाडा मार्गावरील दिघाशी गावातील धर्मिचा पाडा ह्या पाड्यातील एका गरोदर मातेला मुख्य रस्त्यावर आणून रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने थेट चादरीच्या झोळीतून घेऊन जात असताना झोळीतच गरोदर महिलेची प्रसूती होऊन बाळ दगावण्याची घटना गुरुवारी घडली आहे. शनिवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हि दुर्दैवी घटना सर्वांसमोर आली आहे.          दर्शना महादू फरले असे या दुर्दैवी माहिलेचे नाव आहे.एक सप्टेंबर रोजी या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने महिलेला वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चादरीची झोळी करून माहिलेले दवाखान्यात नेले.मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली आणि या महिलेचा बाळ दगावला असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले.           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच हि भीषण परिस्थिती असून वारंवार घडणाऱ्या या घटनांतून आतातरी आमची सुटका होणार का आणि आमच्या आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी आतातरी रस्ता बनणार का की अजूनही आम्हाला अशा चिमुकल्या जीवांना मुकावे लागेल अशी संतप्त येथील नागरिकांकडून येत आहे. 

मागील वर्षी २२ सप्टेंबर २०२१ रोजी धर्मी आजी नावाच्या वृद्ध महिलेचा पाय तुटल्याने या वृद्ध महिलेला स्थानिक नागरिकांनी अशाच प्रकारे लोखंडी पलंगावरूनच या रस्त्यातून रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी नेले होते.धर्मी आजी यांच्या नावावरूनच या आदिवासी पाड्याला धर्मीचा पाडा हे नाव पडले आहे.या घटनेनंतर गेल्या वर्षीपासून श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद पवार यांनी धर्मीचा पाडा या आदिवासी पाड्यावरून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता शासन यंत्रणेने बनवावा या संदर्भात तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार केला होता.मागील एक वर्षापासून या रस्त्या संदर्भातील पाठपुरावा श्रमजीवीचे कार्यकर्ते करत असताना देखील शासन यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच या घटना वाढत असून आता पुन्हा एकदा एका महिलेला आपले मूल गमवावे लागले आहे त्यामुळे अशा घटना वारंवार झाल्यास त्यास जबाबदार कोण आणि शासकीय यंत्रणांचे या आदिवासी पाडायच्या सोयी सुविधांकडे आता तरी लक्ष जाणार का ? असा सवाल येथील नागरिक शासकीय यंत्रणेला विचारत आहेत.देश स्वतंत्र होऊ ७५ वर्ष झाली तरी आदिवासी बांधव अजूनही खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाला नाही अशीही संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांमधून येत आहे.

या महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्यामुळे तिला रुग्णालयात नेणे गरजेचे होते मात्र मुख्य रस्त्यापासून धर्मीचा पाडा येथील अंतर एक ते दीड किलोमीटर असून या पाड्यावर यायला व जायला रस्ता नसल्याने त्या महिलेला आम्ही झोळीतून घेऊन गेलो मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली व त्यानंतर आम्हाला समजले की बाळ दगावले आहे,आमच्या पाड्यावर रस्त्याची सुविधा असती तर हे बाळ दगावले नसते आमच्या पाड्यावर अशा प्रकारे गरोदर महिला अथवा रुग्णांना नेहमीच अशा प्रकारे झोळीतच न्यावे लागते मात्र शासन यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी प्रतिक्रिया धर्मीचा पाडा येथील आदेश रायात या तरुणाने दिली आहे.

गरोदर महिला ही २४ ऑगष्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती ,तिची प्रकृर्ती उत्तम होती परंतु पाड्यावर जाण्यासाठी पाऊस पडला की रस्ता नसल्याने महिलेस चार दिवस आधी रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली होती परंतु घरात लहान मुले असल्याने तिने येणे टाळले.स्थानिक आशा वर्कर्स या गरोदर महिलेच्या सतत संपर्कात होती.मात्र महिलेस अचानक प्रसूती वेदना झाल्याने या महिलेला स्थानिकांनी झोळीतून आणले आणि वाटेतच तिची प्रसूती झाल्याने महिलेचे बाळ दगावले आजच या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात अले असल्याची माहिती वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ माधव कवळे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी