शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

By धीरज परब | Updated: June 14, 2024 17:02 IST

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले.

मीरारोड :  पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवल्यास ती नियंत्रणात आणण्यासह अत्यावश्यक उपाययोजनां बद्दल अधिकारी - कर्मचारी यांना पूर प्रतिसाद धोरण राबविण्या बाबतची कार्यशाळा मीरा भाईंदर महापालिकेने आयोजित केली होती  . 

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात दर पावसाळ्यात वाढत जाणाऱ्या पूरस्थितीने चिंता निर्माण केली असली तरी शहरातील राजकारणी व महापालिका मात्र त्यावर अजूनही गांभीर्याने चिंतन करताना दिसत नाहीत . दरम्यान पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासह तशी स्थिती उद्भवल्यास महापालिका अधीकारी व कर्मचारी यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन व्हावे म्हणून  आयुक्त संजय काटकर यांच्या पुढाकाराने भाईंदरच्या नगरभवन सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . 

मुंबईच्या मे.आगा खान एजेंसी फॉर हबीटेट इंडिया  या संस्थेमार्फत शहरातील वस्ती, नागरिकांची संख्या बहुतांश प्रमाणात वाढत असल्याने शहरात पावसाळा दरम्यान पूरसदृश्य परिस्थिती झाल्यास महापालिका प्रशासनास विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांना मात देऊन पावसाळा दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत शहरात सुव्यवस्था राखण्यात कशाप्रकारे मदत होईल या करिता  मार्गदर्शन करण्यात आले .  आयुक्त काटकर, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त डॉ. सचिन बांगर , शहर अभियंता दिपक खांबित सह कार्यशाळेत सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक वैद्यकीय आरोग्य विभाग , सर्व प्रभाग अधिकारी, परिवहन, उद्यान व वृक्ष प्राधिकरण व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. अतिवृष्टी झाल्यास शहरात पूर परिस्थितीत हाताळण्यास महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्त यांनी नमूद केले. शहरातील पाणी साचण्याच्या सखल भागांची व तेथे बसविण्यात आलेल्या सक्श्न पंपची पाहणी केली गेली आहे . यंदा वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी नाल्यांमध्ये, गटारांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, आपल्या परिसराची स्वच्छता राखून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त  संजय काटकर यांनी केले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmonsoonमोसमी पाऊस