शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या

By धीरज परब | Updated: May 21, 2024 15:42 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत .

मीरारोड - मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन संरक्षणाचे आदेश देऊन देखील भाईंदर मध्ये मात्र इंद्रलोक भागात कांदळवनची निर्घृण कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे . या ठिकाणी कांदळवन वर रासायनिक विषप्रयोग केल्याचे देखील पहिल्यांदा आढळून आले आहे . त्यामुळे जागरूक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यासह कांदळवन संरक्षणाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे .  

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत . न्यायालयाच्या आदेशाने कांदळवन संरक्षण समिती असून पोलीस , महापालिका , महसूल विभाग, कांदळवन विभाग आदींवर कांदळवन संरक्षणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे . 

तसे असताना भाईंदर पूर्वेला इंद्रलोक पोलीस चौकी, राम अनंत इमारत व गावदेवी चाळच्या लगत पूर्वीपासून असलेल्या कांदळवनचे  जंगल सातत्याने नष्ट केले जात आहे . ह्या ठिकाणी भराव करून बेकायदा मार्बल दुकान पासून झोपड्या, गॅरेज , चाळ , इमारत आदी नियमबाह्य उभारले . येथे सर्रास कचरा , डेब्रिस आदींचा बेकायदा भराव करून अनेक मोठी झाडे मारली गेली आहेत . येथील भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद केले गेले आहेत . लघुशंका करणाऱ्यांचा तसेच व्यसनींचा अड्डा बनला आहे .  

ह्या भागातील कांदळवन ऱ्हास आणि कांदळवन क्षेत्रात होणारा भराव - बांधकाम आदी प्रकरणी अनेकवेळा तक्रारी झाल्या असून कांदळवन समिती सह महसूल , कांदळवन विभाग आदींनी स्थळपाहणी केलेल्या आहेत . परंतु वेळीच गुन्हा दाखल करण्यासह कांदळवन संरक्षणासाठी उपाययोजना केली गेल्या नाहीत . न्यायालयाच्या आदेशा नुसार  कचरा - भराव , बांधकामे आदी हटवून भरतीच्या पाण्याचा मार्ग मोकळा केला गेला नाही .  

त्यातूनच सदर जमीन खाजगी असून जमीन मालक आणि विकासकांच्या डोळ्यात भरलेली असल्याने येथील असंख्य मोठी कांदळवन ची झाडे कटर ने कापून तर अनेक झाडांच्या बुध्यांना कट मारून त्यावर  रसायन वापरून चिकटपट्टी लावण्यात आली व झाडांची कत्तल केली गेली आहे.  कांदळवनची कटकारस्थानाने कत्तल केल्याचे निदर्शनास आल्यावर गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे तसेच अन्य पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तात्काळ महसूल , कांदळवन व पोलीस विभागास तक्रार केली . घटनास्थळी संबंधित विभागांनी शनिवारी पाहणी केली असून मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या कांदळवनची आणि परिसराची पाहणी केली .  

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सदर प्रकारची दखल घेत कारवाईचे आदेश अपर तहसीलदार यांना दिले आहेत . झाडांना कट मारून लावलेल्या चिकटपट्ट्या , रसायन व झाडांचे नमुने कांदळवन विभागाने घेतले असून ते तपासणी साठी पाठवले जाणार आहेत असे वनक्षेत्रपाल विक्रांत खाडे यांनी सांगितले .  सदर परिसराच्या तक्रारी व स्थळपाहणी होऊन देखील वेळीच गुन्हे दाखल केले गेले नाहीत . भराव - कचरा व बांधकामे हटवून भरतीच्या पाण्याचे मार्ग मोकळे केले गेले नाहीत . 

त्यामुळे संबंधित विकासक आणि जमीन मालक यांनी कारस्थान करून कांदळवनची कत्तल केल्याचा आरोप गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे व साबीर सय्यद ,  फॉर फ्युचरचे हर्षद ढगे आदींनी केला आहे . या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करा, न्यायालयाच्या आदेशा नुसार  येथील बेकायदा भराव  - बांधकामे तात्काळ हटवा . कांदळवन लागवड  करा . बेजबाबदार अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे .