शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या

By धीरज परब | Updated: May 21, 2024 15:42 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत .

मीरारोड - मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन संरक्षणाचे आदेश देऊन देखील भाईंदर मध्ये मात्र इंद्रलोक भागात कांदळवनची निर्घृण कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे . या ठिकाणी कांदळवन वर रासायनिक विषप्रयोग केल्याचे देखील पहिल्यांदा आढळून आले आहे . त्यामुळे जागरूक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यासह कांदळवन संरक्षणाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे .  

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत . न्यायालयाच्या आदेशाने कांदळवन संरक्षण समिती असून पोलीस , महापालिका , महसूल विभाग, कांदळवन विभाग आदींवर कांदळवन संरक्षणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे . 

तसे असताना भाईंदर पूर्वेला इंद्रलोक पोलीस चौकी, राम अनंत इमारत व गावदेवी चाळच्या लगत पूर्वीपासून असलेल्या कांदळवनचे  जंगल सातत्याने नष्ट केले जात आहे . ह्या ठिकाणी भराव करून बेकायदा मार्बल दुकान पासून झोपड्या, गॅरेज , चाळ , इमारत आदी नियमबाह्य उभारले . येथे सर्रास कचरा , डेब्रिस आदींचा बेकायदा भराव करून अनेक मोठी झाडे मारली गेली आहेत . येथील भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद केले गेले आहेत . लघुशंका करणाऱ्यांचा तसेच व्यसनींचा अड्डा बनला आहे .  

ह्या भागातील कांदळवन ऱ्हास आणि कांदळवन क्षेत्रात होणारा भराव - बांधकाम आदी प्रकरणी अनेकवेळा तक्रारी झाल्या असून कांदळवन समिती सह महसूल , कांदळवन विभाग आदींनी स्थळपाहणी केलेल्या आहेत . परंतु वेळीच गुन्हा दाखल करण्यासह कांदळवन संरक्षणासाठी उपाययोजना केली गेल्या नाहीत . न्यायालयाच्या आदेशा नुसार  कचरा - भराव , बांधकामे आदी हटवून भरतीच्या पाण्याचा मार्ग मोकळा केला गेला नाही .  

त्यातूनच सदर जमीन खाजगी असून जमीन मालक आणि विकासकांच्या डोळ्यात भरलेली असल्याने येथील असंख्य मोठी कांदळवन ची झाडे कटर ने कापून तर अनेक झाडांच्या बुध्यांना कट मारून त्यावर  रसायन वापरून चिकटपट्टी लावण्यात आली व झाडांची कत्तल केली गेली आहे.  कांदळवनची कटकारस्थानाने कत्तल केल्याचे निदर्शनास आल्यावर गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे तसेच अन्य पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तात्काळ महसूल , कांदळवन व पोलीस विभागास तक्रार केली . घटनास्थळी संबंधित विभागांनी शनिवारी पाहणी केली असून मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या कांदळवनची आणि परिसराची पाहणी केली .  

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सदर प्रकारची दखल घेत कारवाईचे आदेश अपर तहसीलदार यांना दिले आहेत . झाडांना कट मारून लावलेल्या चिकटपट्ट्या , रसायन व झाडांचे नमुने कांदळवन विभागाने घेतले असून ते तपासणी साठी पाठवले जाणार आहेत असे वनक्षेत्रपाल विक्रांत खाडे यांनी सांगितले .  सदर परिसराच्या तक्रारी व स्थळपाहणी होऊन देखील वेळीच गुन्हे दाखल केले गेले नाहीत . भराव - कचरा व बांधकामे हटवून भरतीच्या पाण्याचे मार्ग मोकळे केले गेले नाहीत . 

त्यामुळे संबंधित विकासक आणि जमीन मालक यांनी कारस्थान करून कांदळवनची कत्तल केल्याचा आरोप गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे व साबीर सय्यद ,  फॉर फ्युचरचे हर्षद ढगे आदींनी केला आहे . या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करा, न्यायालयाच्या आदेशा नुसार  येथील बेकायदा भराव  - बांधकामे तात्काळ हटवा . कांदळवन लागवड  करा . बेजबाबदार अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे .