शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा; ७२ जणींना दरमहा एक हजारचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंब प्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंब प्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांची उदरनिर्वाहाची समस्या सोडवण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जात आहेत. या विधवांपैकी ७२ जणींना आतापर्यंत एक हजार रुपयांचा लाभ मिळत आहेत. उर्वरित ८७३ महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याने त्या अद्याप या लाभापासून वंचित आहेत.

कोरोना महामारीत आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घरातील कमावते व कुटुंब प्रमुख असलेले ९४५ जण दगावले आहेत. त्यांच्या विधवा पत्नीला आता उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे. यावर केंद्र व राज्य शासनाने लक्ष केंद्रीत करून आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या महिलांना तत्काळ संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन केले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व तालुक्यांतील तहसीलदारांना फर्मान काढून या महिलांना या योजनेचे दरमहा एक हजार रुपये तत्काळ लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ७२ महिलांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा होत आहेत.

कोरोनाच्या महामारीत आई-बाबा दगावलेली बालके, पतीचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिला आदींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कृती दल व टास्क फोर्सचे सभासद जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून या उपेक्षितांचा शोध घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करून संबंधित तहसीलदारांना या महिलांची व्यथा लक्षात आणून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. असे ठाणे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक रामकृष्ण रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

--------पूरक जोड आहे...