शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

९० टक्के सोसायट्यांत कचराप्रक्रियाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:10 IST

सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे.

ठाणे : शहरातील सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ज्या सोसायट्या कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली. या आठवडाभरात अशा सोसायट्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र गुन्हे दाखल करण्याबरोबरच मे पासून त्यांचा कचरा उचलणे बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी निदान या सोसायट्या कच-यावर प्रक्रियेसाठी पुढाकार घेतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सोसाट्यांमध्ये असलेला संभ्रम आणि महापालिकेनेच कच-यावर प्रक्रियेसाठी एखादी एजन्सी नेमून द्यावी या प्रतीक्षेत काही सोसायट्या असल्याने अजूनही त्यांनी कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केलेली नाही. महापालिकेने यासाठी अनेक स्तरावर सोसायट्यांची तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन बॅनर तसेच पोस्टर लावून जनजागृती केली. मात्र, पालिकेच्या प्रयत्नांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.>...म्हणून करणार कारवाईठाण्यातील १ हजारांपेक्षा अधिक सोसायट्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस पाठवल्या असून ज्या सोसायट्या, मॉल तसेच हॉस्पिटलचा दररोजचा कचरा १००० किलोपेक्षा जास्त निर्माण होतो. तसेच ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, अशांनी स्वत:च कच-याची विल्हेवाट लावण्याचे बंधन आहे. सुरुवातीला महापालिकेने कच-याची विल्हेवाट लावण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, तरीही प्रतिसाद न आल्याने काही दिवसांपूर्वी महापालिकेने अशा सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद केले. त्यानंतर त्यांना मार्चपर्यंत कचºयाची विल्हेवाट सोसायटीमध्येच लावण्याची मुदत दिली. परंतु,आतापर्यंत केवळ ८ ते १० टक्के सोसायट्यांनी त्यास सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे प्लान्ट निर्माण करून तो चालवण्यासाठी वेळच नसल्याचे काही सोसायट्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता पुन्हा एकदा महापालिकेने नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्याचे निश्चित केले आहे. तसेच मे पर्यंत कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केली नाही तर कचरा उचलण्याचेदेखील बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.