शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के सोसायट्यांत कचराप्रक्रियाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:10 IST

सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे.

ठाणे : शहरातील सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ज्या सोसायट्या कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली. या आठवडाभरात अशा सोसायट्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र गुन्हे दाखल करण्याबरोबरच मे पासून त्यांचा कचरा उचलणे बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी निदान या सोसायट्या कच-यावर प्रक्रियेसाठी पुढाकार घेतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सोसाट्यांमध्ये असलेला संभ्रम आणि महापालिकेनेच कच-यावर प्रक्रियेसाठी एखादी एजन्सी नेमून द्यावी या प्रतीक्षेत काही सोसायट्या असल्याने अजूनही त्यांनी कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केलेली नाही. महापालिकेने यासाठी अनेक स्तरावर सोसायट्यांची तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन बॅनर तसेच पोस्टर लावून जनजागृती केली. मात्र, पालिकेच्या प्रयत्नांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.>...म्हणून करणार कारवाईठाण्यातील १ हजारांपेक्षा अधिक सोसायट्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस पाठवल्या असून ज्या सोसायट्या, मॉल तसेच हॉस्पिटलचा दररोजचा कचरा १००० किलोपेक्षा जास्त निर्माण होतो. तसेच ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, अशांनी स्वत:च कच-याची विल्हेवाट लावण्याचे बंधन आहे. सुरुवातीला महापालिकेने कच-याची विल्हेवाट लावण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, तरीही प्रतिसाद न आल्याने काही दिवसांपूर्वी महापालिकेने अशा सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद केले. त्यानंतर त्यांना मार्चपर्यंत कचºयाची विल्हेवाट सोसायटीमध्येच लावण्याची मुदत दिली. परंतु,आतापर्यंत केवळ ८ ते १० टक्के सोसायट्यांनी त्यास सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे प्लान्ट निर्माण करून तो चालवण्यासाठी वेळच नसल्याचे काही सोसायट्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता पुन्हा एकदा महापालिकेने नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्याचे निश्चित केले आहे. तसेच मे पर्यंत कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केली नाही तर कचरा उचलण्याचेदेखील बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.