शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

९० टक्के हिंदू धर्मात अंधश्रद्धा श्रद्धा म्हणून पाळल्या जातात- अतुल समर्थ यांचे मत     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:27 IST

ठाण्यातील एनकेटी सभाग्रुहात अतुल समर्थ यांचे अंधश्रद्धा विरोधी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

ठळक मुद्दे अंधश्रद्धा विरोधी व्याख्यानाचे आयोजनअतुल समर्थ यांनी ठाण्यात व्यक्त केले मत व्यक्तिच्या अंगात येते हे मला मान्य नाही - अतुल समर्थ

ठाणे :  आपले कर्म ठरवते आपले  काय होणार. तुमचे नशिब तुम्ही घडवता तुमचे तारे नाही. ९० टक्के हिंदू धर्मात अंधश्रद्धा श्रद्धा म्हणून पाळल्या जातात असे मत अतुल समर्थ यांनी ठाण्यात व्यक्त केले.   

     स्वामी विश्व सेवा संघ व अजोर फाऊंडेशन ट्रस्ट यांच्यावतीने ठाण्यातील एनकेटी सभाग्रुहात समर्थ यांचे अंधश्रद्धा विरोधी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यक्तिच्या अंगात येते हे मला मान्य नाही. देवाला कोणाच्या अंगाची गरज लागत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी असलेली देव ही संकल्पना मला कधिच मान्य नाही. देवाकडे जाण्याचा मार्ग हा द्न्यान आहे. करणी ह्या प्रकारावर अनेकांचा विश्वास आहे. मात्र असे काही असते तर सीमेवर सेनेची गरज लागली नसती. लिंबू नावाच्या बाँबने परकीय सैन्यावर करणी केली की सगळी समस्या संपली असती. देवाने अशी कोणतीही वाईट शक्ति निर्माण केली नाही. आध्यात्म म्हणजे एक झाड आहे, फळ देणे हे त्याचे काम आहे. तुम्ही ते फळ चोरुन, दगड मारुन किंवा कसे घेता ते तुमच्यावर अवलंबून असते. काही तरी मिळवण्यासाठी जप हा  मोजुन केला जातो. आपण श्वास मोजुन घेतो का , मग जप कसा मोजता. माझ्या श्वासात स्वामी आहेत, त्यामुळे स्वामी माझे ऐकतात असे अतुलदादा पुढे म्हणाले.

आपले अनुभव कथन करताना ते म्हणाले, एक मुलगी लग्न हाेण्यासाठी दासबोध वाचत असे.  मी तिला म्हंटले ज्यांनी स्वत‌ः लग्न केले नाही ते लग्नासाठी तुला मदत करणार नाही. वडाला फेर्‍या  मारुन सात जन्म काही मिळत नाही. मात्र झाडाला देव बनवल्याने झाडे तुटण्यापासुन  वाचतात हेच कारण आहे असे समर्थ यांनी सांगितले.

यावेळी वास्तूविषारद सुप्रिया समर्थ यांनी घरात उपलब्ध वस्तूंपासून वास्तूतील दोष निवारण मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या स्वयंपाक घर म्हणजे घराचा आत्मा. तो प्रसन्न असला की प्रगती होतेच. स्वयंपाकगृह  हे घराच्या अग्नेय दिशेला असावे.त्यात पुर्व दिशेचस स्वयंपाक घर काही प्रमाणात चालते. मात्र इतर दिशेला ते असल्यास घरातील लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी पिरॅमिड म्हणजे प्लास्टिक हा उपाय नाही. घरात असलेले खडे मिठ घरात चारही कोपर्‍यांमधे  ठेवल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होते.  स्वयंपाक घरात पाणी आणि अग्नि एकत्र येतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणुन मातीच्या मडक्यात लाकडी चमचे भरुन या दोन्हिच्या मधे ठेवावे. उपवरांच्या लग्नाला विलंब होत असल्यास दर गुरुवारी चिमुटभर हळद अंघोळीच्या पाण्यात घालावी. वाईट स्वप्न पडत असल्यास उशीखाली लसुन पाकळ्या ठेवाव्या. स्वयंपाकघर पुर्व, उत्तर, इशान्य दिशेला असल्यास शेगडीखाली हिरवा खडा तर दक्षिण, नैऋत्य व पश्चिमेला असल्यास पिवळा खडा ठेवावा. मुलांचे अभ्यासात लक्ष नसल्यास घरात पुदीन्याच्या काडया ठेवाव्या. असे अनेक उपाय सुप्रिया यांनी सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी कानोलकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई