शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परराज्यातून येणारे ९० टक्के प्रवासी ‘आरटीपीसीआर’विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

कल्याण : कोरोनाला आळा घालण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवून प्रवास करणे ...

कल्याण : कोरोनाला आळा घालण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवून प्रवास करणे बंधनकारक आहे. मात्र, परराज्यातून रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून कल्याण स्थानकात आलेल्या प्रवाशांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हा अहवाल नसल्याचे आढळून आले. परिणामी या प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याची शक्यता असल्याने त्यांची कल्याण स्थानकात अँटिजन चाचणी केली जात आहे.

मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकात दररोज पूर्व आणि दक्षिण भारतातून येणाऱ्या अनेक गाड्या थांबतात. त्यात उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, परप्रांतातून येणारे प्रवासी ही चाचणी न करताच कल्याणमध्ये रेल्वेने दाखल होत आहेत. त्यामुळे कल्याण स्थानकात अशा प्रवाशांची रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून कसून चौकशी केली जात आहे. जवळपास ९० टक्के प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या प्रवाशांची अँटिजन चाचणी केली जात आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली मनपाने अँटिजन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र कोरोना रोखण्यासाठी रेल्वेकडून कोणत्याही ठोस प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचे यातून उघड होत आहे.

संसर्गाची भीती?

- केडीएमसी हद्दीत १७ फेब्रुवारीपासून आलेली कोरोनाची दुसरी लाट सध्याच्या लॉकडाऊनमुळे ओसरताना दिसत आहे. सध्या मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून आरटीपीसीआर चाचणी न करताच प्रवासी कल्याणमध्ये येत असतील तर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- जून २०२० मध्ये मिशन बिगिन अगेन या मोहिमेंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी केडीएमसीने तेव्हापासून रेल्वे स्थानक आणि बस डेपोंमध्ये प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली होती.

----------------------