शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून येणारे ९० टक्के प्रवासी ‘आरटीपीसीआर’विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

कल्याण : कोरोनाला आळा घालण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवून प्रवास करणे ...

कल्याण : कोरोनाला आळा घालण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवून प्रवास करणे बंधनकारक आहे. मात्र, परराज्यातून रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून कल्याण स्थानकात आलेल्या प्रवाशांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हा अहवाल नसल्याचे आढळून आले. परिणामी या प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याची शक्यता असल्याने त्यांची कल्याण स्थानकात अँटिजन चाचणी केली जात आहे.

मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकात दररोज पूर्व आणि दक्षिण भारतातून येणाऱ्या अनेक गाड्या थांबतात. त्यात उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, परप्रांतातून येणारे प्रवासी ही चाचणी न करताच कल्याणमध्ये रेल्वेने दाखल होत आहेत. त्यामुळे कल्याण स्थानकात अशा प्रवाशांची रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून कसून चौकशी केली जात आहे. जवळपास ९० टक्के प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या प्रवाशांची अँटिजन चाचणी केली जात आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली मनपाने अँटिजन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र कोरोना रोखण्यासाठी रेल्वेकडून कोणत्याही ठोस प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचे यातून उघड होत आहे.

संसर्गाची भीती?

- केडीएमसी हद्दीत १७ फेब्रुवारीपासून आलेली कोरोनाची दुसरी लाट सध्याच्या लॉकडाऊनमुळे ओसरताना दिसत आहे. सध्या मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून आरटीपीसीआर चाचणी न करताच प्रवासी कल्याणमध्ये येत असतील तर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- जून २०२० मध्ये मिशन बिगिन अगेन या मोहिमेंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी केडीएमसीने तेव्हापासून रेल्वे स्थानक आणि बस डेपोंमध्ये प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली होती.

----------------------