शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक ; १५० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश

By अजित मांडके | Updated: June 9, 2023 16:35 IST

१५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

ठाणे : तुळशीधाम रोड, धर्मवीर नगर, या ठिकाणी आशिर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये आग लागून ९० मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. तसेच या आगीने मोठया प्रमाणात धूर झाल्याने इमारतीत अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक ते एक वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर ही आग जवळपास एक तासांनी नियंत्रणात आली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

आशिर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये अचानक आग लागली. आगीने क्षणात पेट घेतला. तसेच या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर इमारतीच्या पतीसरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस, महावितरण विभाग आणि  बाळकुम अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीमुळे धूर मोठया प्रमाणात तळ मजल्यावरून बाहेर येऊन इमारतीच्या परिसरात पसरत होता.

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या इमारतीमध्ये अडकलेल्या सुमारे-१५० रहिवाश्यांची पहिल्यांदा सुखरूप  बाहेर काढून सुटका आले. या घटनेत त्या इमारती मधील एकूण ९० मीटर बॉक्स पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. तर मीटर बॉक्सला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक तासांनी म्हणजे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली.

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून ही आग शॉटसर्किट मुळे लागली असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.