शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक ; १५० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश

By अजित मांडके | Updated: June 9, 2023 16:35 IST

१५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

ठाणे : तुळशीधाम रोड, धर्मवीर नगर, या ठिकाणी आशिर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये आग लागून ९० मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. तसेच या आगीने मोठया प्रमाणात धूर झाल्याने इमारतीत अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक ते एक वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर ही आग जवळपास एक तासांनी नियंत्रणात आली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

आशिर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये अचानक आग लागली. आगीने क्षणात पेट घेतला. तसेच या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर इमारतीच्या पतीसरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस, महावितरण विभाग आणि  बाळकुम अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीमुळे धूर मोठया प्रमाणात तळ मजल्यावरून बाहेर येऊन इमारतीच्या परिसरात पसरत होता.

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या इमारतीमध्ये अडकलेल्या सुमारे-१५० रहिवाश्यांची पहिल्यांदा सुखरूप  बाहेर काढून सुटका आले. या घटनेत त्या इमारती मधील एकूण ९० मीटर बॉक्स पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. तर मीटर बॉक्सला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक तासांनी म्हणजे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली.

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून ही आग शॉटसर्किट मुळे लागली असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.