शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

८८ ग्रा.पं होणार हागणदारी मुक्त

By admin | Updated: September 26, 2015 22:23 IST

राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील ८८ ग्राम पंचायतींमध्ये युद्धपातळीवर जनजागृती करून त्याना २ आॅक्टोंबरपर्यंत हागणदरी मुक्त करण्याचा

ठाणे: राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील ८८ ग्राम पंचायतींमध्ये युद्धपातळीवर जनजागृती करून त्याना २ आॅक्टोंबरपर्यंत हागणदरी मुक्त करण्याचा संकल्प ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था विभागाने केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गावपाड्यांमध्ये ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ भिवंडी तालुक्यातील रहनाळ गावात शुक्रवारी करण्यात आला. खासदार कपील पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून हा संकल्प केला. ८८ ग्राम पंचायतींचे सरपंच,उपस्थित गावकरी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम सेवक, आदींना स्वच्छतेची शपथ देऊन हागणदरीमुक्त होण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. जिल्ह्यात सुमारे ४२५ ग्राम पंचायती आहेत. त्यातील ८८ ग्राम पंचायती २ आॅक्टोबरपर्यंत हागणदरी मुक्त करायच्या आहेत. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ग्राम सभा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी या ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचे घोषीत करणार आहेत. यासाठी या ग्राम पंचायतींमधील प्रत्येक घरासाठी शौचालय बांधण्यासाठी गावागावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीला सुमारे ३७ हजार शौचालये असल्याचा दावा केला जात असून या वर्षात ४२ हजार शौचालये बांधण्यासाठी नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)