शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तिन्ही मतदारसंघांसाठी ८७ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:31 IST

आज होणार छाननी : शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ११४ उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यासाठी मंगळवार या शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह ८७ जणांनी त्यांची ११४ नामनिर्देशनपत्रे (अर्ज) दाखल केली आहेत. संभाव्य धोके टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या प्राप्त अर्जांची १० एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे.

ठाणे मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३५, कल्याणमध्ये ३६ उमेदवारांनी ५० आणि भिवंडीत २२ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. या तीन मतदारसंघांमध्ये ८७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. यापैकी खरी लढत ठाणे मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना-भाजपाचे राजन विचारे आणि काँग्रेस-राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यात होईल. याप्रमाणेच कल्याणमधून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी काँग्रेस-राष्टÑवादीचे बाबाजी पाटील, तर भिवंडीमधून विद्यमान खासदार भाजपा-शिवसेनेचे कपिल पाटील यांच्याशी काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे सुरेश टावरे यांच्यात होणार आहे.

याप्रमाणेच ठाण्यातील बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रभाकर जाधव,सर्वोदय भारत पार्टीचे बृह्मदेव पांडे, भारत जन आधार पार्टीचे अजय गुप्ता, हिंदुस्थान निर्माण दलचे ओंकारनाथ तिवारी आणि डॉ. अक्षय झोडगे या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. तसेच बहुजन आघाडीतर्फे कोपरखैरणे येथील मल्लिकार्जुन पुजारी, रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय घाटे, तर सुधारक शिंदे, माधवीलता मौर्य या अपक्षांनी उमेदवारी दाखल केली. मंगळवारी रमेश श्रीवास्तव (अपक्ष), सुभाषचंद्र झा (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), हेमंत पाटील (सनातन संस्कृती रक्षा दल), राजेशचंद्र जैस्वार (बसपा), उस्मान शेख (बहुजन महापार्टी), राजेश कांबळे (बहुजन मुक्ती), ओमप्रकाश पाल (अपक्ष) मोहम्मद सलीम चौधरी (अपक्ष), दिलीप अलोनी (अखिल भारतीय जनसंघ), सुरेंद्रकुमार जैन (नैतिक पार्टी), विनोद पोखरकर (अपक्ष), राहुल कांबळे (बहुजन मुक्ती), शुभांगी चव्हाण (अपक्ष), दिगंबर बनसोडे (अपक्ष), दत्तात्रेय सावळे (अपक्ष), विठ्ठल चव्हाण (संभाजी ब्रिगेड), प्रमोद कांबळी (अपक्ष), मुकेश तिवारी (अपक्ष) आदींनी ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे. कल्याण मतदारसंघातून शिवा कृष्णमूर्ती अय्यर, नरेंद्र मोरे, सोनाली गंगावणे, सुरेश पाल, अजय मौर्या, दिनकर पालके, देवेंद्र सिंग, पंकज सप्तीसकर, संजय जाधव, युसुफ खान, यास्मिन सलीम, वसीम सय्यद, अस्मिता पुराणिक, नफीस अन्सारी, विनय दुबे, जोतीराम सरोदे, चंद्रकांत मोटे, सुहास बोंडे, अमरीश मोरजकर, जफरुल्लाह सय्यद, संदेश इंगळे, योगेश्वर रतेश्वर आदी २२ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आकाश पाटील यानेही राष्ट्रवादीचा अर्ज दाखल केला आहे. मुनीर अन्सारी (इंडियन युनियन मुस्लिम लीग), महम्मद खान (बहुजन महापार्टी), वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडावू, बहुजन समाज पार्टीचे रवींद्र केणे यांनी तर मिलिंद कांबळे यांनी भारत जनआधार पार्टीचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. विनोद साळवे (भारतीय किसान पार्टी), संतोष भालेराव (आंबेडकर राइट पार्टी आॅफ इंडिया), हबिबूर खान (पिस पार्टी), हरेश ब्राह्मणे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), गौतम वाघचौरे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. सुरेश गवई (भारत प्रभात पार्टी) यांनीही अर्ज दाखल केले आहेत.भिवंडी लोकसभेचा आखाडाभिवंडी मतदारसंघातून नितेश जाधव, संजय पाटील (अपक्ष), किशोर किनकर (भारत प्रभात), खासदार पाटील यांचा पुतण्या देवेश पाटील (भाजपा), बाळाराम म्हात्रे (अपक्ष), अरुण सावंत (वंचित बहुजन आघाडी), दीपक खांबेकर (अपक्ष), योगेश कथोरे (अपक्ष), फिरोज शेख (जनअधिकार) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.याशिवाय कपिल पाटील (अपक्ष), नुरूद्दीन अन्सारी (समाजवादी), नुरूद्दीन अन्सारी (हिंदुस्थान शक्ती सेना), सुहास बोंडे (अपक्ष), कपिल धामणे (अपक्ष), संजय वाघ (भारतीय ट्रायबल पक्ष), विश्वनाथ पाटील (अपक्ष), नवीन मोमिन (अपक्ष) आणि सुरेश म्हात्रे (अपक्ष) आदी उमेदवारही भिवंडी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत.