शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रेल्वेमार्गांसाठी ८६९ झाडांवर संक्रांत! वृक्ष प्राधिकरणाचा हिरवा कंदील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:29 IST

नवीन रेल्वेमार्गांमध्ये बाधित होणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने शुक्रवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीच्या सभेत ठेवला होता. त्यानुसार, ८६९ झाडे तोडण्यास समितीने हिरवा कंदील दाखवला.

कल्याण : नवीन रेल्वेमार्गांमध्ये बाधित होणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने शुक्रवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीच्या सभेत ठेवला होता. त्यानुसार, ८६९ झाडे तोडण्यास समितीने हिरवा कंदील दाखवला.कल्याण-टिटवाळा, दिवा-वसई, पनवेल-वसई या रेल्वेमार्गांवर अतिरिक्त नवीन रूळ टाकण्यात येणार आहेत. या कामामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी आणि पुनर्राेपण करण्यासाठी रेल्वेने केडीएमसीकडे परवानगी मागितली होती. त्यादृष्टीने प्रशासनाने शुक्रवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केले होते. एकूण बाधित ८६९ झाडांमध्ये २७ झाडांच्या फांद्या छाटण्यात येणार आहेत, तर उर्वरित झाडे तोडली जाणार आहेत. हे प्रस्ताव चर्चेला येताच त्याला एकमताने मान्यता देण्यात आली. कायदेशीर अडचणी तसेच कोणाची हरकत आहे का, असाही सवाल समितीचे अध्यक्ष वेलरासू यांनी उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना केला. त्यावर रेल्वेच्या हद्दीतील झाडांबाबत एक हरकत नोंदवण्यात आल्याचे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले. उद्यान विभागानेच ही हरकत निकाली काढावी, अशा सूचना वेलरासू यांनी केली. झाडे तोडल्यावर त्याबदल्यात रेल्वेकडून पुनर्राेपण होते की नाही, याचीही शहानिशा उद्यान विभागाने करावी, असेही वेलरासू यांनी सांगितले.झाडे तोडण्यासाठी एजन्सीपावसाळ्यात झाडांची छाटणी केली जाते, तसेच वाºयामुळे झाडे उन्मळून पडतात. या काळात धोकादायक झाडे तोडण्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येतात. परवानगी दिल्यानंतर खाजगी व्यक्तींकडून झाडे तोडलीही जातात. परंतु, त्यांच्या फांद्या, पालापाचोळा तेथेच पडून असतो. तो पालिकेला उचलावा लागतो. त्यामुळे आता झाडे तोडण्यासाठी एजन्सी नेमण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. झाडे तोडणे, त्याची विल्हेवाट लावणे, अशी सर्व कामे एजन्सीने करावी तसेच त्यांच्या कामगारांचा अपघात विमाही त्यांनीच काढावा आणि झाडे तोडताना मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असेल, असा निर्णय सदस्यांनी घेतला.झाडांवर विषप्रयोग झाल्याच्या आरोपांत तथ्य नाहीरेन ट्री या एकाच जातीच्या झाडांवर मिलीबगचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु, या झाडांवर विषप्रयोग झाल्याचा होत असलेला आरोप पाहता, असे असते तर अन्य झाडांवरही असा प्रयोग झाला असता, असे वेलरासू यांनी सांगितले. यासंदर्भात पुरावे असतील तर द्या, चौकशी करू, असेही ते म्हणाले.सदस्यांच्या शंकेवर स्पष्टीकरण देताना उद्यान अधीक्षक जाधव यांनीही जाणूनबुजून कोणी झाडे मारल्याच्या आरोपाचा इन्कार केला. एकाच जातीच्या झाडांना हा रोग लागला आहे. त्यामुळे ती सुकली आहेत. जर अन्य जातींची झाडेही सुकली असती तर शंकेला वाव होता, असेही ते या वेळी म्हणाले.