शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

८३ हजार कुटुंबांना ‘आरोग्यकवच’, कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:44 IST

केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे.

ठाणे : केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे. त्यानुसार, या प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक वर्षासाठी पाच लाखांचा ‘आरोग्य विमा’ उतरवला जाणार आहे. ही आकडेवारी २०११ रोजी केलेल्या माहिती संकलनानुसार (सर्व्हे) असून त्या प्रत्येक कुटुंबाची पुन्हा तालुकानिहाय माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले असून संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.केंद्र सरकारद्वारे देशभरातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक निष्कर्षाद्वारे २०११ या वर्षी माहिती संकलन केले. त्यानुसार, देशात १० करोड, तर राज्यात ८३ लाख ७४ हजार कुटुंबं त्या निष्कर्षाखाली असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी केलेल्या माहिती संकलनानुसार, कुटुंबामध्ये कोणाचे नाव राहिले आहे का तसेच यादरम्यान, कोणाचे निधन झाले आहे का? त्याचबरोबर ते कुटुंब दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात स्थलांतरित झाले नाही ना, यासाठी पुन्हा त्या कुटुंबांचे माहिती संकलन केले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी बीडीओ, तालुका अधिकारी, डीएचओ यांच्या सभा घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागामार्फत आशा आणि एएनएम यांना त्याबाबत प्रशिक्षण देत १ ते ८ मे दरम्यान पुन्हा काम सुरू केले आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यातील भिवंडी आणि मुरबाड दोन तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित तालुक्यात हे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही योजना सध्या प्राथमिक स्तरावर असून योजनेंतर्गत लवकर आर्थिक व सामाजिक निष्कर्षाखाली असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्यकवच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ही माहिती केली जाते गोळामाहिती संकलन पूर्ण झाल्यावर प्रत्येक कुटुंबाची माहिती आॅनलाइन दिसणार आहे. त्यासाठी त्या कुटुंबप्रमुखाचा मोबाइल नंबर, शिधावाटप क्रमांक आणि नावे यांची माहिती संकलित केली जात आहे. सर्वाधिक कुटुंबे भिवंडीतठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ३०,८११ कुटुंबे शहापूर तालुक्यात आहेत. त्याचपाठोपाठ भिवंडी, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांत आहेत.