शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

८३ हजार कुटुंबांना ‘आरोग्यकवच’, कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:44 IST

केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे.

ठाणे : केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे. त्यानुसार, या प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक वर्षासाठी पाच लाखांचा ‘आरोग्य विमा’ उतरवला जाणार आहे. ही आकडेवारी २०११ रोजी केलेल्या माहिती संकलनानुसार (सर्व्हे) असून त्या प्रत्येक कुटुंबाची पुन्हा तालुकानिहाय माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले असून संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.केंद्र सरकारद्वारे देशभरातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक निष्कर्षाद्वारे २०११ या वर्षी माहिती संकलन केले. त्यानुसार, देशात १० करोड, तर राज्यात ८३ लाख ७४ हजार कुटुंबं त्या निष्कर्षाखाली असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी केलेल्या माहिती संकलनानुसार, कुटुंबामध्ये कोणाचे नाव राहिले आहे का तसेच यादरम्यान, कोणाचे निधन झाले आहे का? त्याचबरोबर ते कुटुंब दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात स्थलांतरित झाले नाही ना, यासाठी पुन्हा त्या कुटुंबांचे माहिती संकलन केले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी बीडीओ, तालुका अधिकारी, डीएचओ यांच्या सभा घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागामार्फत आशा आणि एएनएम यांना त्याबाबत प्रशिक्षण देत १ ते ८ मे दरम्यान पुन्हा काम सुरू केले आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यातील भिवंडी आणि मुरबाड दोन तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित तालुक्यात हे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही योजना सध्या प्राथमिक स्तरावर असून योजनेंतर्गत लवकर आर्थिक व सामाजिक निष्कर्षाखाली असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्यकवच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ही माहिती केली जाते गोळामाहिती संकलन पूर्ण झाल्यावर प्रत्येक कुटुंबाची माहिती आॅनलाइन दिसणार आहे. त्यासाठी त्या कुटुंबप्रमुखाचा मोबाइल नंबर, शिधावाटप क्रमांक आणि नावे यांची माहिती संकलित केली जात आहे. सर्वाधिक कुटुंबे भिवंडीतठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ३०,८११ कुटुंबे शहापूर तालुक्यात आहेत. त्याचपाठोपाठ भिवंडी, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांत आहेत.