शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

८३ हजार कुटुंबांना ‘आरोग्यकवच’, कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:44 IST

केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे.

ठाणे : केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे. त्यानुसार, या प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक वर्षासाठी पाच लाखांचा ‘आरोग्य विमा’ उतरवला जाणार आहे. ही आकडेवारी २०११ रोजी केलेल्या माहिती संकलनानुसार (सर्व्हे) असून त्या प्रत्येक कुटुंबाची पुन्हा तालुकानिहाय माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले असून संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.केंद्र सरकारद्वारे देशभरातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक निष्कर्षाद्वारे २०११ या वर्षी माहिती संकलन केले. त्यानुसार, देशात १० करोड, तर राज्यात ८३ लाख ७४ हजार कुटुंबं त्या निष्कर्षाखाली असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी केलेल्या माहिती संकलनानुसार, कुटुंबामध्ये कोणाचे नाव राहिले आहे का तसेच यादरम्यान, कोणाचे निधन झाले आहे का? त्याचबरोबर ते कुटुंब दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात स्थलांतरित झाले नाही ना, यासाठी पुन्हा त्या कुटुंबांचे माहिती संकलन केले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी बीडीओ, तालुका अधिकारी, डीएचओ यांच्या सभा घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागामार्फत आशा आणि एएनएम यांना त्याबाबत प्रशिक्षण देत १ ते ८ मे दरम्यान पुन्हा काम सुरू केले आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यातील भिवंडी आणि मुरबाड दोन तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित तालुक्यात हे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही योजना सध्या प्राथमिक स्तरावर असून योजनेंतर्गत लवकर आर्थिक व सामाजिक निष्कर्षाखाली असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्यकवच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ही माहिती केली जाते गोळामाहिती संकलन पूर्ण झाल्यावर प्रत्येक कुटुंबाची माहिती आॅनलाइन दिसणार आहे. त्यासाठी त्या कुटुंबप्रमुखाचा मोबाइल नंबर, शिधावाटप क्रमांक आणि नावे यांची माहिती संकलित केली जात आहे. सर्वाधिक कुटुंबे भिवंडीतठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ३०,८११ कुटुंबे शहापूर तालुक्यात आहेत. त्याचपाठोपाठ भिवंडी, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांत आहेत.