शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:44 IST

रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या.

- सुरेश लोखंडेठाणे : रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमध्ये सुमारे ४८ निष्पाप जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर रविवारी खडवलीच्या नदीत तीन बुडाले असता त्यातील एकाचे शव मिळाले असून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.खडवलीजवळून वाहत असलेल्या भातसा नदी पात्रात रविवारी तिघे बुडाले. त्या पाठोपाठ उन्हासनदीपात्रात दोघे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या जीव घेण्या घटनांमध्ये निष्पाप जीव जात आहेत. या आधी मागील आठमहिन्याच्या कालावधीत ८३ जीव घेण्या घटना घडल्या त्यात ४८ जणांचा मृत्यू झाला. यातील नैसर्गिक घटना वगळता अन्य घटना ह्या निष्काळजी व दुर्लक्षितपणाच्या आहेत. यामध्ये दुरांतो एक्स्प्रेसच्या दुर्दैवी घटनेप्रमाणेच लागलेल्या आगी, इमारतींच्या दुर्घटना, गॅस गळती, भंगारच्या दुकास लागलेल्या आगी, डम्पिंगच्या आगीमुळे निघत असलेला जीवघेणा धूर, त्यामुळे गुदमरण्याच्या घटनांनी जिल्ह्यातील नागरिक हैराण आहेत.निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या केवळ तीन महिन्यात २४ घटना घडल्या. यात सर्वाधिक १२ घटना आगीच्या आहेत. यामध्ये ओवळा येथील गोडाऊन, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाऊन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली,शहाड गावठाण, ठाणेची खारकर आळी आदी ठिकाणी नुकत्याच आगीच्या घटना घडल्या उर्वरित अन्य घटनांमध्ये चार निष्पाप लोकांचा बळी गेला. तर आठरा जण गंभीर जखमी आहेत. नैसर्गिक दुर्घनेत वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला. तर नाल्यात वाहून गेल्यासह नदीत बुडालेले, स्लॅब कोसळून, भींत पडून, पर्यटन स्थळी घसरून, नदीत वाहून आदी दुर्दैवी घटनांमध्ये ३२ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. याशिवाय ६९ जण गंभीररित्या जखमी झाले.>रासायनिक दुर्घटना रोखणाऱ्या उपाययोजनांची गरजरासायनिक स्फोटांमुळे झालेल्या आगींची संख्या जिल्ह्यात अधिक आहेत. या रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्याजवळील केमीकल कंपनीची दुर्घटना, घोडबंदर रोडवर केमिकलचे बीपीसीएलच्या टँकरचा अपघात, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमीकलचे गोडाऊन, नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोडावूनची आग आदी रासायनिक कंपन्या व त्यांच्या निष्कळजीपणातून झालेल्या घटना ठाणे जिल्ह्यास घातक आहे. या रासायनिक घटनांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कंपन्यांवर कडक कारवाईची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.