शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:44 IST

रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या.

- सुरेश लोखंडेठाणे : रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमध्ये सुमारे ४८ निष्पाप जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर रविवारी खडवलीच्या नदीत तीन बुडाले असता त्यातील एकाचे शव मिळाले असून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.खडवलीजवळून वाहत असलेल्या भातसा नदी पात्रात रविवारी तिघे बुडाले. त्या पाठोपाठ उन्हासनदीपात्रात दोघे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या जीव घेण्या घटनांमध्ये निष्पाप जीव जात आहेत. या आधी मागील आठमहिन्याच्या कालावधीत ८३ जीव घेण्या घटना घडल्या त्यात ४८ जणांचा मृत्यू झाला. यातील नैसर्गिक घटना वगळता अन्य घटना ह्या निष्काळजी व दुर्लक्षितपणाच्या आहेत. यामध्ये दुरांतो एक्स्प्रेसच्या दुर्दैवी घटनेप्रमाणेच लागलेल्या आगी, इमारतींच्या दुर्घटना, गॅस गळती, भंगारच्या दुकास लागलेल्या आगी, डम्पिंगच्या आगीमुळे निघत असलेला जीवघेणा धूर, त्यामुळे गुदमरण्याच्या घटनांनी जिल्ह्यातील नागरिक हैराण आहेत.निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या केवळ तीन महिन्यात २४ घटना घडल्या. यात सर्वाधिक १२ घटना आगीच्या आहेत. यामध्ये ओवळा येथील गोडाऊन, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाऊन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली,शहाड गावठाण, ठाणेची खारकर आळी आदी ठिकाणी नुकत्याच आगीच्या घटना घडल्या उर्वरित अन्य घटनांमध्ये चार निष्पाप लोकांचा बळी गेला. तर आठरा जण गंभीर जखमी आहेत. नैसर्गिक दुर्घनेत वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला. तर नाल्यात वाहून गेल्यासह नदीत बुडालेले, स्लॅब कोसळून, भींत पडून, पर्यटन स्थळी घसरून, नदीत वाहून आदी दुर्दैवी घटनांमध्ये ३२ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. याशिवाय ६९ जण गंभीररित्या जखमी झाले.>रासायनिक दुर्घटना रोखणाऱ्या उपाययोजनांची गरजरासायनिक स्फोटांमुळे झालेल्या आगींची संख्या जिल्ह्यात अधिक आहेत. या रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्याजवळील केमीकल कंपनीची दुर्घटना, घोडबंदर रोडवर केमिकलचे बीपीसीएलच्या टँकरचा अपघात, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमीकलचे गोडाऊन, नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोडावूनची आग आदी रासायनिक कंपन्या व त्यांच्या निष्कळजीपणातून झालेल्या घटना ठाणे जिल्ह्यास घातक आहे. या रासायनिक घटनांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कंपन्यांवर कडक कारवाईची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.