शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

आठ महिन्यांत ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:44 IST

रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या.

- सुरेश लोखंडेठाणे : रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमध्ये सुमारे ४८ निष्पाप जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर रविवारी खडवलीच्या नदीत तीन बुडाले असता त्यातील एकाचे शव मिळाले असून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.खडवलीजवळून वाहत असलेल्या भातसा नदी पात्रात रविवारी तिघे बुडाले. त्या पाठोपाठ उन्हासनदीपात्रात दोघे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या जीव घेण्या घटनांमध्ये निष्पाप जीव जात आहेत. या आधी मागील आठमहिन्याच्या कालावधीत ८३ जीव घेण्या घटना घडल्या त्यात ४८ जणांचा मृत्यू झाला. यातील नैसर्गिक घटना वगळता अन्य घटना ह्या निष्काळजी व दुर्लक्षितपणाच्या आहेत. यामध्ये दुरांतो एक्स्प्रेसच्या दुर्दैवी घटनेप्रमाणेच लागलेल्या आगी, इमारतींच्या दुर्घटना, गॅस गळती, भंगारच्या दुकास लागलेल्या आगी, डम्पिंगच्या आगीमुळे निघत असलेला जीवघेणा धूर, त्यामुळे गुदमरण्याच्या घटनांनी जिल्ह्यातील नागरिक हैराण आहेत.निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या केवळ तीन महिन्यात २४ घटना घडल्या. यात सर्वाधिक १२ घटना आगीच्या आहेत. यामध्ये ओवळा येथील गोडाऊन, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाऊन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली,शहाड गावठाण, ठाणेची खारकर आळी आदी ठिकाणी नुकत्याच आगीच्या घटना घडल्या उर्वरित अन्य घटनांमध्ये चार निष्पाप लोकांचा बळी गेला. तर आठरा जण गंभीर जखमी आहेत. नैसर्गिक दुर्घनेत वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला. तर नाल्यात वाहून गेल्यासह नदीत बुडालेले, स्लॅब कोसळून, भींत पडून, पर्यटन स्थळी घसरून, नदीत वाहून आदी दुर्दैवी घटनांमध्ये ३२ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. याशिवाय ६९ जण गंभीररित्या जखमी झाले.>रासायनिक दुर्घटना रोखणाऱ्या उपाययोजनांची गरजरासायनिक स्फोटांमुळे झालेल्या आगींची संख्या जिल्ह्यात अधिक आहेत. या रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्याजवळील केमीकल कंपनीची दुर्घटना, घोडबंदर रोडवर केमिकलचे बीपीसीएलच्या टँकरचा अपघात, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमीकलचे गोडाऊन, नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोडावूनची आग आदी रासायनिक कंपन्या व त्यांच्या निष्कळजीपणातून झालेल्या घटना ठाणे जिल्ह्यास घातक आहे. या रासायनिक घटनांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कंपन्यांवर कडक कारवाईची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.