शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बदलापूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ८२ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ८२ कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. नगरविकास विभागाने निधीची तरतूद केल्यास पाणीपुरवठा विभाग तत्काळ योजनेचे काम सुरू करील, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

बदलापूर येथील अमृत अभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ७. २ द. ल. लि. क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्राचे उद्घाटन शिंदे आणि पाटील यांच्या हस्ते बदलापूरला झाले. यावेळी बदलापूरच्या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उभय मंत्र्यांनी दिले

पाणीपुरवठ्याच्या ८२ कोटी रुपयांच्या योजनेला नगरोत्थानमधून मंजुरी देत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. याचबरोबर एमआयडीसीकडून पाच एमएलडी वाढीव पाणी वाढवून देण्यात येईल. नागरिकांच्या गरजा पाहून सेवा पुरविणे ही शासनाची आणि पालिकांची जबाबदारी आहे. वाद बाजूला ठेवून शहराचे हित पाहणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. उल्हास खोरे पुनरुज्जीवन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुरू होणारा पाणीपुरवठा अपुराच असल्याची खंत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपासून शिवसेना प्रकल्पाचा पाठपुरावा करीत असून, एमआयडीसीकडून पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मजीप्राचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे, आदी उपस्थित होते.

...........