शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

बदलापूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ८२ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ८२ कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. नगरविकास विभागाने निधीची तरतूद केल्यास पाणीपुरवठा विभाग तत्काळ योजनेचे काम सुरू करील, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

बदलापूर येथील अमृत अभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ७. २ द. ल. लि. क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्राचे उद्घाटन शिंदे आणि पाटील यांच्या हस्ते बदलापूरला झाले. यावेळी बदलापूरच्या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उभय मंत्र्यांनी दिले

पाणीपुरवठ्याच्या ८२ कोटी रुपयांच्या योजनेला नगरोत्थानमधून मंजुरी देत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. याचबरोबर एमआयडीसीकडून पाच एमएलडी वाढीव पाणी वाढवून देण्यात येईल. नागरिकांच्या गरजा पाहून सेवा पुरविणे ही शासनाची आणि पालिकांची जबाबदारी आहे. वाद बाजूला ठेवून शहराचे हित पाहणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. उल्हास खोरे पुनरुज्जीवन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुरू होणारा पाणीपुरवठा अपुराच असल्याची खंत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपासून शिवसेना प्रकल्पाचा पाठपुरावा करीत असून, एमआयडीसीकडून पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मजीप्राचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे, आदी उपस्थित होते.

...........