शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ८२ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ८२ कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. नगरविकास विभागाने निधीची तरतूद केल्यास पाणीपुरवठा विभाग तत्काळ योजनेचे काम सुरू करील, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

बदलापूर येथील अमृत अभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ७. २ द. ल. लि. क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्राचे उद्घाटन शिंदे आणि पाटील यांच्या हस्ते बदलापूरला झाले. यावेळी बदलापूरच्या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उभय मंत्र्यांनी दिले

पाणीपुरवठ्याच्या ८२ कोटी रुपयांच्या योजनेला नगरोत्थानमधून मंजुरी देत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. याचबरोबर एमआयडीसीकडून पाच एमएलडी वाढीव पाणी वाढवून देण्यात येईल. नागरिकांच्या गरजा पाहून सेवा पुरविणे ही शासनाची आणि पालिकांची जबाबदारी आहे. वाद बाजूला ठेवून शहराचे हित पाहणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. उल्हास खोरे पुनरुज्जीवन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुरू होणारा पाणीपुरवठा अपुराच असल्याची खंत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपासून शिवसेना प्रकल्पाचा पाठपुरावा करीत असून, एमआयडीसीकडून पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मजीप्राचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे, आदी उपस्थित होते.

...........