शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

राष्ट्रीय महामार्गावर ८१ बळी, दोन वर्षांचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:27 IST

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे.

मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. दोन वर्षांत या रस्त्यावर विविध अपघातांत ८१ जणांचा बळी गेला असून १३० जण गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचा चढता आलेख पाहता राष्ट्रीय महामार्ग विभागाला अपघातमुक्त रस्ता करण्यास अपयश आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.कल्याण-नगर हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तसेच राज्याच्या मध्यभागातून जात असल्याने तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याआधीच येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. या वाढीव वाहनांचे नियंत्रण करण्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीस खाते अपयशी ठरल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिक सांगतात.दरवर्षी रस्त्याचे नूतनीकरण करण्यापासून ते डागडुजी करणे, दिशादर्शक बसवणे, खड्डे भरणे, कॅटाइन बसवणे यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतात. मात्र, जागोजागी पोलीस चौक्या उभारूनही वेगमर्यादा तसेच भारमान मर्यादेवर नियंत्रण नसल्याने दररोज अपघातात बळी जातात. गेल्या अडीच वर्षांत मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या कार्यालयातून माहिती मागितली असता त्यांनी टोकावडे तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातून ही माहिती उपलब्ध करून दिली.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारणा केली असता अपघात रोखणे, ही पोलीस खात्याची जबाबदारी असल्याचे मत या विभागाचे उपअभियंता सुनील पाटील यांनी व्यक्त केले.>दोन वर्षांतील अपघातांची आकडेवारी२०१६ मध्ये टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४३ जणांना जीव गमवावा लागला असून यात महिलांची संख्या १०, तर ३३ पुरुष आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या ७८ असून पुरु ष ५७, तर महिला २१ आहेत. मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये एकूण ५२ अपघात घडले असून त्यात १५ पुरु ष आणि एक महिला ठार झाली. गंभीर जखमींमध्ये १९ पुरु ष आणि एक महिलेचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये २७ पुरुष आणि पाच महिला.२०१७ मध्ये ४८ अपघातांत १३ पुरुष आणि एक महिला दगावली. १० अपघातांत १९ पुरुष आणि चार महिला या गंभीर जखमी झाल्या. किरकोळ अपघात १५ झाले असून २० पुरु ष व एक महिला जखमी झालेली आहे . सन २०१८ च्या जून महिन्यापर्यंत १३ अपघात झाले असून सात पुरुष व एक स्त्रीला जीव गमवावा लागला आहे. चार अपघातांत नऊ पुरु ष गंभीर जखमी झाले आहेत. दोन किरकोळ अपघातांत चार पुरु ष व एक महिला जखमी झाली असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेली आहे.कल्याण-नगर, म्हारळ ते माळशेज घाट असा ९४ किमीचा राष्टÑीय महामार्ग आमच्या हद्दीत येतो. येथे दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. यासाठी प्रथम वाहनचालक आणि जनता यांच्यात प्रबोधन करण्यात येईल. जे चालक वेगमर्यादा तसेच भारमानाची मर्यादा ओलांडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आमच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे. कालच उमरोली पोलीस चौकीवर नवीन पीएसआय हजर झाले आहेत. त्यांना सूचना करण्यात आली आहे. येथे अपघातमुक्त प्रवास होण्यालाच प्राधान्य असेल. - श्रीकांत मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्टÑीय महामार्ग विभाग, ठाणे