शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

राष्ट्रीय महामार्गावर ८१ बळी, दोन वर्षांचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:27 IST

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे.

मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. दोन वर्षांत या रस्त्यावर विविध अपघातांत ८१ जणांचा बळी गेला असून १३० जण गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचा चढता आलेख पाहता राष्ट्रीय महामार्ग विभागाला अपघातमुक्त रस्ता करण्यास अपयश आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.कल्याण-नगर हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तसेच राज्याच्या मध्यभागातून जात असल्याने तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याआधीच येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. या वाढीव वाहनांचे नियंत्रण करण्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीस खाते अपयशी ठरल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिक सांगतात.दरवर्षी रस्त्याचे नूतनीकरण करण्यापासून ते डागडुजी करणे, दिशादर्शक बसवणे, खड्डे भरणे, कॅटाइन बसवणे यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतात. मात्र, जागोजागी पोलीस चौक्या उभारूनही वेगमर्यादा तसेच भारमान मर्यादेवर नियंत्रण नसल्याने दररोज अपघातात बळी जातात. गेल्या अडीच वर्षांत मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या कार्यालयातून माहिती मागितली असता त्यांनी टोकावडे तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातून ही माहिती उपलब्ध करून दिली.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारणा केली असता अपघात रोखणे, ही पोलीस खात्याची जबाबदारी असल्याचे मत या विभागाचे उपअभियंता सुनील पाटील यांनी व्यक्त केले.>दोन वर्षांतील अपघातांची आकडेवारी२०१६ मध्ये टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४३ जणांना जीव गमवावा लागला असून यात महिलांची संख्या १०, तर ३३ पुरुष आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या ७८ असून पुरु ष ५७, तर महिला २१ आहेत. मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये एकूण ५२ अपघात घडले असून त्यात १५ पुरु ष आणि एक महिला ठार झाली. गंभीर जखमींमध्ये १९ पुरु ष आणि एक महिलेचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये २७ पुरुष आणि पाच महिला.२०१७ मध्ये ४८ अपघातांत १३ पुरुष आणि एक महिला दगावली. १० अपघातांत १९ पुरुष आणि चार महिला या गंभीर जखमी झाल्या. किरकोळ अपघात १५ झाले असून २० पुरु ष व एक महिला जखमी झालेली आहे . सन २०१८ च्या जून महिन्यापर्यंत १३ अपघात झाले असून सात पुरुष व एक स्त्रीला जीव गमवावा लागला आहे. चार अपघातांत नऊ पुरु ष गंभीर जखमी झाले आहेत. दोन किरकोळ अपघातांत चार पुरु ष व एक महिला जखमी झाली असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेली आहे.कल्याण-नगर, म्हारळ ते माळशेज घाट असा ९४ किमीचा राष्टÑीय महामार्ग आमच्या हद्दीत येतो. येथे दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. यासाठी प्रथम वाहनचालक आणि जनता यांच्यात प्रबोधन करण्यात येईल. जे चालक वेगमर्यादा तसेच भारमानाची मर्यादा ओलांडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आमच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे. कालच उमरोली पोलीस चौकीवर नवीन पीएसआय हजर झाले आहेत. त्यांना सूचना करण्यात आली आहे. येथे अपघातमुक्त प्रवास होण्यालाच प्राधान्य असेल. - श्रीकांत मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्टÑीय महामार्ग विभाग, ठाणे