शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

राष्ट्रीय महामार्गावर ८१ बळी, दोन वर्षांचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:27 IST

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे.

मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. दोन वर्षांत या रस्त्यावर विविध अपघातांत ८१ जणांचा बळी गेला असून १३० जण गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचा चढता आलेख पाहता राष्ट्रीय महामार्ग विभागाला अपघातमुक्त रस्ता करण्यास अपयश आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.कल्याण-नगर हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तसेच राज्याच्या मध्यभागातून जात असल्याने तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याआधीच येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. या वाढीव वाहनांचे नियंत्रण करण्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीस खाते अपयशी ठरल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिक सांगतात.दरवर्षी रस्त्याचे नूतनीकरण करण्यापासून ते डागडुजी करणे, दिशादर्शक बसवणे, खड्डे भरणे, कॅटाइन बसवणे यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतात. मात्र, जागोजागी पोलीस चौक्या उभारूनही वेगमर्यादा तसेच भारमान मर्यादेवर नियंत्रण नसल्याने दररोज अपघातात बळी जातात. गेल्या अडीच वर्षांत मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या कार्यालयातून माहिती मागितली असता त्यांनी टोकावडे तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातून ही माहिती उपलब्ध करून दिली.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारणा केली असता अपघात रोखणे, ही पोलीस खात्याची जबाबदारी असल्याचे मत या विभागाचे उपअभियंता सुनील पाटील यांनी व्यक्त केले.>दोन वर्षांतील अपघातांची आकडेवारी२०१६ मध्ये टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४३ जणांना जीव गमवावा लागला असून यात महिलांची संख्या १०, तर ३३ पुरुष आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या ७८ असून पुरु ष ५७, तर महिला २१ आहेत. मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये एकूण ५२ अपघात घडले असून त्यात १५ पुरु ष आणि एक महिला ठार झाली. गंभीर जखमींमध्ये १९ पुरु ष आणि एक महिलेचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये २७ पुरुष आणि पाच महिला.२०१७ मध्ये ४८ अपघातांत १३ पुरुष आणि एक महिला दगावली. १० अपघातांत १९ पुरुष आणि चार महिला या गंभीर जखमी झाल्या. किरकोळ अपघात १५ झाले असून २० पुरु ष व एक महिला जखमी झालेली आहे . सन २०१८ च्या जून महिन्यापर्यंत १३ अपघात झाले असून सात पुरुष व एक स्त्रीला जीव गमवावा लागला आहे. चार अपघातांत नऊ पुरु ष गंभीर जखमी झाले आहेत. दोन किरकोळ अपघातांत चार पुरु ष व एक महिला जखमी झाली असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेली आहे.कल्याण-नगर, म्हारळ ते माळशेज घाट असा ९४ किमीचा राष्टÑीय महामार्ग आमच्या हद्दीत येतो. येथे दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. यासाठी प्रथम वाहनचालक आणि जनता यांच्यात प्रबोधन करण्यात येईल. जे चालक वेगमर्यादा तसेच भारमानाची मर्यादा ओलांडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आमच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे. कालच उमरोली पोलीस चौकीवर नवीन पीएसआय हजर झाले आहेत. त्यांना सूचना करण्यात आली आहे. येथे अपघातमुक्त प्रवास होण्यालाच प्राधान्य असेल. - श्रीकांत मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्टÑीय महामार्ग विभाग, ठाणे