शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ...

ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ठाणे एसटी विभागामार्फत तब्बल ८०० बसेसचे नियोजन केल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. या जादा वाहतुकीचा कालावधी ६ ते १० सप्टेंबर २०२१ असा असून परतीच्या वाहतुकीचा कालावधी हा १४ ते १६ सप्टेंबर असा असणार आहे. ज्या भक्तांना गावी जायचे असेल त्यांनी १५ जुलैपासून आपले आरक्षण बुक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आजही एसटीला प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आजही एसटी विभागाची ५१ टक्केच वाहतूक सुरू आहे. त्यातही संपूर्ण क्षमतेने एसटी बसेस बाहेर पडताना दिसत नाहीत. परंतु सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीनेदेखील आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे आगाऊ संगणकीय आरक्षणाची सोयदेखील करण्यात आलेली आहे. संगणकीय आरक्षणाचा कालावधी हा ६० दिवस आधी एकूण ८०० गाड्यांचे नियोजन या विभागाकडून करण्यात आलेले आहे. त्यानुसार चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा मार्गावर रा.प. ठाणे विभागातील बोरीवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी या बसस्थानकावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील कोकणवासी गणेशभक्त व कोकण गणेश मंडळे यांनी ठाणे विभागातील आगाराशी संपर्क साधण्यात यावा व सुरक्षित प्रवासाकरिता एस.टी. बसनेच प्रवास करण्याबाबत ठाणे एसटी विभागाने आवाहन केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी विभागातील बसस्थानकावरील आरक्षण खिडक्या २४ तास सुरू राहणार आहेत. त्यानुसार ६० दिवस आधी जाण्याचे बुकिंग करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोकणात जाण्यासाठी आरक्षण बुकिंग हे १५ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत सुरू होणार आहे. यावर्षीच्या गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत ८०० गाड्य़ा सोडल्या जाणार आहेत.