शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ...

ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ठाणे एसटी विभागामार्फत तब्बल ८०० बसेसचे नियोजन केल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. या जादा वाहतुकीचा कालावधी ६ ते १० सप्टेंबर २०२१ असा असून परतीच्या वाहतुकीचा कालावधी हा १४ ते १६ सप्टेंबर असा असणार आहे. ज्या भक्तांना गावी जायचे असेल त्यांनी १५ जुलैपासून आपले आरक्षण बुक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आजही एसटीला प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आजही एसटी विभागाची ५१ टक्केच वाहतूक सुरू आहे. त्यातही संपूर्ण क्षमतेने एसटी बसेस बाहेर पडताना दिसत नाहीत. परंतु सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीनेदेखील आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे आगाऊ संगणकीय आरक्षणाची सोयदेखील करण्यात आलेली आहे. संगणकीय आरक्षणाचा कालावधी हा ६० दिवस आधी एकूण ८०० गाड्यांचे नियोजन या विभागाकडून करण्यात आलेले आहे. त्यानुसार चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा मार्गावर रा.प. ठाणे विभागातील बोरीवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी या बसस्थानकावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील कोकणवासी गणेशभक्त व कोकण गणेश मंडळे यांनी ठाणे विभागातील आगाराशी संपर्क साधण्यात यावा व सुरक्षित प्रवासाकरिता एस.टी. बसनेच प्रवास करण्याबाबत ठाणे एसटी विभागाने आवाहन केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी विभागातील बसस्थानकावरील आरक्षण खिडक्या २४ तास सुरू राहणार आहेत. त्यानुसार ६० दिवस आधी जाण्याचे बुकिंग करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोकणात जाण्यासाठी आरक्षण बुकिंग हे १५ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत सुरू होणार आहे. यावर्षीच्या गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत ८०० गाड्य़ा सोडल्या जाणार आहेत.