शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ...

ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ठाणे एसटी विभागामार्फत तब्बल ८०० बसेसचे नियोजन केल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. या जादा वाहतुकीचा कालावधी ६ ते १० सप्टेंबर २०२१ असा असून परतीच्या वाहतुकीचा कालावधी हा १४ ते १६ सप्टेंबर असा असणार आहे. ज्या भक्तांना गावी जायचे असेल त्यांनी १५ जुलैपासून आपले आरक्षण बुक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आजही एसटीला प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आजही एसटी विभागाची ५१ टक्केच वाहतूक सुरू आहे. त्यातही संपूर्ण क्षमतेने एसटी बसेस बाहेर पडताना दिसत नाहीत. परंतु सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीनेदेखील आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे आगाऊ संगणकीय आरक्षणाची सोयदेखील करण्यात आलेली आहे. संगणकीय आरक्षणाचा कालावधी हा ६० दिवस आधी एकूण ८०० गाड्यांचे नियोजन या विभागाकडून करण्यात आलेले आहे. त्यानुसार चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा मार्गावर रा.प. ठाणे विभागातील बोरीवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी या बसस्थानकावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील कोकणवासी गणेशभक्त व कोकण गणेश मंडळे यांनी ठाणे विभागातील आगाराशी संपर्क साधण्यात यावा व सुरक्षित प्रवासाकरिता एस.टी. बसनेच प्रवास करण्याबाबत ठाणे एसटी विभागाने आवाहन केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी विभागातील बसस्थानकावरील आरक्षण खिडक्या २४ तास सुरू राहणार आहेत. त्यानुसार ६० दिवस आधी जाण्याचे बुकिंग करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोकणात जाण्यासाठी आरक्षण बुकिंग हे १५ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत सुरू होणार आहे. यावर्षीच्या गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत ८०० गाड्य़ा सोडल्या जाणार आहेत.