शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

८० टक्के शाळांना हेडमास्तरच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:27 IST

एकीकडे २०१८-१९ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे.

ठाणे : एकीकडे २०१८-१९ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. अत्याधुनिक शिक्षणपद्धती अंगीकारण्यासाठीदेखील पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, असे असतानाही तब्बल ८० टक्के शाळांना सलग तिसऱ्या वर्षी मुख्याध्यापक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिजिटलचे धडे देणे, ई-लर्निंग आदींसह इतर योजना शिक्षण विभागाने हाती घेतल्या आहेत. परंतु, आता तर यंदाचे शैक्षणिक वर्षदेखील सुरू झाले आहे. असे असतानादेखील अद्यापही महापालिका शाळांना मुख्याध्यापक देता आलेले नाहीत.यासंदर्भात काही शिक्षक संघटनांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये जुन्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदाची सूत्रे दिली होती. परंतु, त्यांना जबाबदाºया मात्र दिल्या नव्हत्या. अनेक शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळेही अनेक शिक्षक जे मुख्याध्यापकांची जबाबदारी सहज पेलू शकतात, तेदेखील यापासून वंचित राहण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.महापालिकेच्या ८१ शाळा इमारती असून त्यामध्ये १२१ शाळा चालवल्या जातात. यामध्ये सुमारे ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्याचे काम १२०० शिक्षक करत आहेत. परंतु, मराठी माध्यमाच्या २९, उर्दू माध्यमाच्या १९ आणि हिंदी माध्यमाच्या ४ अशा एकूण ५२ शाळांना मुख्याध्यापक अद्यापही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.>आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने हा विषय प्रलंबित राहिलेला आहे. परंतु, आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच हा विषय मार्गी लावला जाणार आहे.- विकास रेपाळे, शिक्षण मंडळ अध्यक्ष