शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

८० बांधकाम परवाने अडचणीत?

By admin | Updated: September 1, 2016 02:52 IST

नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे

उल्हासनगर : नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे. करपे यांनी दिलेले सुमारे ८० बांधकाम परवाने जुन्या की नवीन विकास आराखड्यानुसार दिले, याच्या चौकशीची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण आशाण यांनी केली आहे. त्यांनी आयुक्तांकडे सर्वच बांधकाम परवान्यांची चौकशी करावी, असे सुचवले आहे. यामुळे करपे यांनी दिलेले बांधकाम परवाने अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेले नगररचनाकार करपे यांचा १२ दिवसांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही. यापूर्वीचे नगररचनाकार जेलची हवा खाऊन आले असून तराणी यांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. तर, प्रल्हाद होगे- पाटील, किरण सोनावणे यांचे बांधकाम परवाने वादात सापडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे. करपे यांनी दिलेल्या बांधकाम परवान्यांची चौकशी करण्याची मागणी आमदार ज्योती कलानी यांनी केल्यावर पालिका वर्तुळात खळबळ उडाली. बेपत्ता झालेले करपे मागील महिन्यात फक्त आठ दिवस पालिकेत आले होते. आठ दिवसांत ३९ बांधकाम परवाने मंजूर कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी अधिकारी व खाजगी वास्तुविशारद यांच्या मदतीने करपे यांनी पालिकेबाहेरच बांधकाम परवाने मंजूर केले असून यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. यातील बहुतांश बांधकाम परवाने खोट्या सनदेवर, खुल्या जागेवर, आरक्षित भूखंडांवर व खोट्या कागदांवर झाल्याचा आरोप कलानी यांनी केला आहे.३९ पैकी जे परवाने नियमानुसार आहेत, त्यांना स्थगिती आदेशातून वगळण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. तत्कालीन, नगररचनाकार अरुण गुडगुडे यांनी दिलेल्या ११० बांधकाम परवान्यांची चौकशी आठ वर्षांपासून सुरू असताना बिल्डरांनी यातील ९० टक्के बांधकामे पूर्ण करून विक्रीही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)