शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

मीरा-भार्इंदरमधील ७८ बार बंद

By admin | Updated: May 4, 2017 05:47 IST

मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग झाल्यानंतरही त्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने या रस्त्यावरील ७८ बार मंगळवारपासून बंद केले. त्यात काही वाईन व बिअर शॉपचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हा फटका बसल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले. पश्चिम महामार्गावरील अनेक बार सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे बंद झाले आहेत. २००६ पूर्वी काशिमिरा ते उत्तन दरम्यान असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ सार्वजनिक विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत केला. त्यामुळे काशिमीरा ते पूर्वीचे रेल्वे फाटक दरम्यानचा रस्ता तसेच रेल्वे फाटक ते भार्इंदर पोलिस ठाणेमार्गे उत्तन दरम्यानच्या रस्त्याची देखभाल दुरूस्ती पालिकेकडूनच केली जाते. त्यामुळे सध्या हा महामार्ग नसून तो शहरातंर्गत वाहतुकीचा रस्ता २००६ पासून अस्तित्वात आला आहे. परंतु, बांधकाम विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरीत झाल्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे हा रस्ता उत्पादन शुल्क विभागाच्या दप्तरी राज्य महामार्ग म्हणूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे हा रस्ता महामार्गाशी संबंधित नसला तरी उत्पादन शुल्क विभागाने या मार्गावर सुरु असलेले ७८ बार, बिअर व वाईन शॉप मंगळवारपासून बंद केले आहेत. बार अचानक बंद केल्याने बारमालकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे धाव घेतली. विभागाने त्यांना तो रस्ता पालिकेच्या अखत्यारित असल्याचे पत्र आणण्यास सांगितले. पत्र आणूनही त्यावर विभागाचे समाधान न झाल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडून पत्र आणण्याचे निर्देश दिले. ते पत्र बारमालकांनी आणल्यानंतर विभागाने अधिसूचनेची मागणी केली. मात्र बांधकाम विभागाकडे पुर्नअधिसूचनेची नोंदच नसल्याने बारमालकांची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)नूतनीकरणाचे शुल्क वसूलच्पत्रांनुसार उत्पादन शुल्क विभागाने त्या बारचे पुढील वर्षाचे आगाऊ नूतनीकरण शुल्कही वसूल केले आहे. त्यात परमीट रूमसाठी ४ लाख, वाईन शॉपसाठी ६ लाख व बिअर शॉपसाठी १ लाख २० हजार रुपये मालकांनी एक्साईज विभागाकडे जमा केले आहेत.च्नूतनीकरणाची रक्कम वसूल करूनही बार बंद केल्याने मालकांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली आहे. बारमालकांचेहोतेय नुकसानच्राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतच्या पट्यातील बार बंद करण्याचे आदेश दिल्याने बारमालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पालिका व बांधकाम विभागाच्या दप्तरी तो रस्ता महामार्ग नसल्याची नोंद असतानाही केवळ अधिसूचना नसल्याचे कारण देत एक्साईज विभागाने केलेली कारवाई अयोग्य आहे. आम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. - मधुकर शेट्टी, अध्यक्ष, बार आयहेल्प सेल. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५० हून अधिक बार बंद केले आहेत. महामार्गाच्या नोंदीप्रमाणे ५०० मीटर परिसरातील बार बंद करणे अपेक्षित असतानाही तसे न करता केवळ गृहीत धरलेल्या महामार्गावरीलच बार बंद केले आहेत. हे अयोग्य आहे.- अरविंद शेट्टी, पदाधिकारी, मीरा-भार्इंदर हॉटेल असोसिएशन.