शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मीरा-भार्इंदरमधील ७८ बार बंद

By admin | Updated: May 4, 2017 05:47 IST

मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग झाल्यानंतरही त्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने या रस्त्यावरील ७८ बार मंगळवारपासून बंद केले. त्यात काही वाईन व बिअर शॉपचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हा फटका बसल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले. पश्चिम महामार्गावरील अनेक बार सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे बंद झाले आहेत. २००६ पूर्वी काशिमिरा ते उत्तन दरम्यान असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ सार्वजनिक विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत केला. त्यामुळे काशिमीरा ते पूर्वीचे रेल्वे फाटक दरम्यानचा रस्ता तसेच रेल्वे फाटक ते भार्इंदर पोलिस ठाणेमार्गे उत्तन दरम्यानच्या रस्त्याची देखभाल दुरूस्ती पालिकेकडूनच केली जाते. त्यामुळे सध्या हा महामार्ग नसून तो शहरातंर्गत वाहतुकीचा रस्ता २००६ पासून अस्तित्वात आला आहे. परंतु, बांधकाम विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरीत झाल्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे हा रस्ता उत्पादन शुल्क विभागाच्या दप्तरी राज्य महामार्ग म्हणूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे हा रस्ता महामार्गाशी संबंधित नसला तरी उत्पादन शुल्क विभागाने या मार्गावर सुरु असलेले ७८ बार, बिअर व वाईन शॉप मंगळवारपासून बंद केले आहेत. बार अचानक बंद केल्याने बारमालकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे धाव घेतली. विभागाने त्यांना तो रस्ता पालिकेच्या अखत्यारित असल्याचे पत्र आणण्यास सांगितले. पत्र आणूनही त्यावर विभागाचे समाधान न झाल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडून पत्र आणण्याचे निर्देश दिले. ते पत्र बारमालकांनी आणल्यानंतर विभागाने अधिसूचनेची मागणी केली. मात्र बांधकाम विभागाकडे पुर्नअधिसूचनेची नोंदच नसल्याने बारमालकांची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)नूतनीकरणाचे शुल्क वसूलच्पत्रांनुसार उत्पादन शुल्क विभागाने त्या बारचे पुढील वर्षाचे आगाऊ नूतनीकरण शुल्कही वसूल केले आहे. त्यात परमीट रूमसाठी ४ लाख, वाईन शॉपसाठी ६ लाख व बिअर शॉपसाठी १ लाख २० हजार रुपये मालकांनी एक्साईज विभागाकडे जमा केले आहेत.च्नूतनीकरणाची रक्कम वसूल करूनही बार बंद केल्याने मालकांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली आहे. बारमालकांचेहोतेय नुकसानच्राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतच्या पट्यातील बार बंद करण्याचे आदेश दिल्याने बारमालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पालिका व बांधकाम विभागाच्या दप्तरी तो रस्ता महामार्ग नसल्याची नोंद असतानाही केवळ अधिसूचना नसल्याचे कारण देत एक्साईज विभागाने केलेली कारवाई अयोग्य आहे. आम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. - मधुकर शेट्टी, अध्यक्ष, बार आयहेल्प सेल. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५० हून अधिक बार बंद केले आहेत. महामार्गाच्या नोंदीप्रमाणे ५०० मीटर परिसरातील बार बंद करणे अपेक्षित असतानाही तसे न करता केवळ गृहीत धरलेल्या महामार्गावरीलच बार बंद केले आहेत. हे अयोग्य आहे.- अरविंद शेट्टी, पदाधिकारी, मीरा-भार्इंदर हॉटेल असोसिएशन.