शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

७६ बंदी झाले पदवीधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:45 IST

कारागृहात राहूनही अभ्यासाची आवड जोपासणारे बंदी गेल्या १५ वर्षांपासून परीक्षेला बसूनउत्तमोत्तम यश मिळवत आहेत. २००३ पासून सुरू झालेल्या

- प्रज्ञा म्हात्रे। लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कारागृहात राहूनही अभ्यासाची आवड जोपासणारे बंदी गेल्या १५ वर्षांपासून परीक्षेला बसूनउत्तमोत्तम यश मिळवत आहेत. २००३ पासून सुरू झालेल्या या परीक्षेत आतापर्यंत ७६ बंदी पदवीधर झाले. भविष्यात त्यांच्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येईल, असे कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून २००३ सालापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींसाठी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. दरवर्षी तिला बसणाऱ्यांची संख्या कमी जास्त होत असते. बंदींसाठी प्रवेशाची फी आकारली जात नाही. त्यांचे आॅफलाईन फॉर्म्स भरले जातात. ज्या कारागृहात केंद्र असते त्याच कारागृहात परीक्षा घेतल्या जातात. ठाणे मध्यवर्ती कारागृह हे त्यापैकी एक आहे. परीक्षेच्या काळात देखरेखीसाठी विद्यापीठाचे पर्यवेक्षक, कारागृहातील गुरूजी असतात. यंदा परीक्षेला प्रथम वर्षासाठी ९, द्वितीय वर्षासाठी १२ तर तृतीय वर्षासाठी ४ बंदी तर गतवर्षी प्रथम वर्षासाठी ३२, द्वितीय वर्षासाठी ८ तर तृतीय वर्षासाठी ६ बंदी बसले होते. गतवर्षीचा आकडा तुलनेने अधिक होता. या तिन्ही वर्षांसाठी गतवर्षी ४६ तर यंदा केवळ २५ बंदी बसले होते. गतवर्षी ४६ बंदींपैकी २८ बंदी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. ती मागच्या महिन्यात पार पडली, अशी माहीती कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांनी दिली. सध्या बंदींना कला आणि वाणिज्य शाखेतून परीक्षा देण्याची सोय आहे. कला शाखेकडे बंदींचा जास्त कल असल्याने या विभागातून परीक्षेला बसणाऱ्या बंदींची संख्या अधिक आहे असे त्यांनी सांगितले. ज्यांना शिकायची इच्छा आहे असे बंदी परीक्षेला बसून वर्षभर अभ्यास करतात आणि त्यांना काही शंका असल्यास कारागृहातील गुरूजींना विचारतात. भविष्यात एम.ए, एम.कॉम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा असलेले बंदी या परीक्षाही देऊ शकतील. सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. जर हे बंदी आतमध्ये राहून शिकले तर कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना नोकरी मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच, ते शिकल्यास चांगले व सुशिक्षीत नागरिकही बनतील, असा विश्वासही वायचळ यांनी व्यक्त केला. गांधी विचारांच्या परीक्षेत बंदी पासगांधी सर्वोदय मंडळाकडून गांधी विचारांवर दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला कारागृहातील ९५ बंदी बसले होते. सर्व बंदी पास झाले असून या परीक्षेत ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा १०० टक्के निकाल लागला आहे.