शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

७५ टक्के रिक्षा सीएनजीवर, तरी भाडे पेट्रोलचेच!

By admin | Updated: January 19, 2016 02:07 IST

एकीकडे परिवहन सेवेचे दर आटोक्यात येत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा तरी स्वस्त होतील, अशा आशेवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना

कल्याण : एकीकडे परिवहन सेवेचे दर आटोक्यात येत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा तरी स्वस्त होतील, अशा आशेवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आरटीओचा भोंगळ कारभार आणि रिक्षा संघटनांच्या भूमिकेच्या वादाचा फटका बसला आहे. या वादात अजून वर्षभर तरी रिक्षांचे भाडे कमी होण्याची चिन्हे नाहीत. पंपांच्या कमतरतेमुळे या परिसरातील रिक्षा १०० टक्के सीएनजीवर चालण्यास अजून वर्ष लागण्याची चिन्हे आहेत. ७५ टक्के रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी त्यांचे नवे दरपत्रक लागू होऊ शकते, असे सांगणारे आरटीओचे अधिकारी तेवढे प्रमाण गाठूनही मूग गिळून गप्प आहेत, तर जोवर १०० टक्के रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होत नाहीत, तोवर म्हणजे अजून वर्षभर नवे दरपत्रक लागू होऊ शकत नाही, अशी संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे तूर्त तरी प्रवाशांना पेट्रोलच्या वाढीव दरपत्रकानुसारच प्रवास करावा लागणार आहे. रुपया-दोन रुपयांची बेकायदा भाडेवाढ होत असूनही अणि शेअर रिक्षांच्या भाड्यात मनमानी दरवाढ होऊनही आरटीओने आजवर कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षे पेट्रोलचे दर वाढताच भाडेवाढ होते, पण गेल्या वर्षभरात सातत्याने दर कमी होऊनही भाड्यात कपात झालेली नाही. कल्याण आरटीओ कार्यालयांतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा, विठ्ठलवाडी, मुरबाड हा भाग येतो. या परिसरात सध्या जवळपास २२ हजार रिक्षा चालतात. कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सक्षम नसल्याने ती सगळीकडे पूर्णपणे पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे रिक्षा प्रवासाला सक्षम पर्याय देण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. रिक्षा १०० टक्के सीएनजीवर चालवाव्या, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केली आहे. आधीपासूनच ते ही मागणी करीत आहेत. एकूण रिक्षांपैकी ७५ टक्के रिक्षा सीएनजीवर चालतात. आता अवघ्या २५ टक्के रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होणे शिल्लक आहे. हे काम कधी पूर्ण होईल, याबाबतची वेळ-काळ सांगता येणार नाही, असे कल्याण आरटीओ कार्यालयाचे सरकारी उत्तर आहे. रिक्षाचालकांवर सीएनजीची सक्ती करता येत नाही. सीएनजी इंधनाचे पंप कल्याण-डोंबिवलीत कमी प्रमाणात आहेत, असे कारण त्यांनी त्यासाठी दिले आहे. सध्या भिवंडी मार्गावर रांजनोली येथे सीएनजी पंप आहे. दुसरा पंप शीळफाटा मार्गावर आहे. तिसरा पंप अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यावर आहे. कल्याण पश्चिमेला जोकर टॉकीजजवळ एक पंप आहे. रिक्षांची संख्या पाहता आणखी चार सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर परावर्तीत झाल्यावर सीएनजीचे दरपत्रक जाहीर करता येते. सध्या अजून काही रिक्षा शिल्लक आहेत. ते प्रमाण पूर्ण झाले की, लगेचच सीएनजीचे दरपत्रक लागू होईल. पण, ते कधी होईल, हे सांगता येत नाही, असे आरटीओचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवलीत आणखी चार सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. कल्याण शहरात एकच पंप आहे. डोंबिवली पश्चिमेला, मानपाडा रोडवर, कल्याण पूर्वेला आणि कल्याण पश्चिमेतील शहाड पूल परिसरात सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. अद्याप हे पंप उभारण्यात आलेले नाहीत, असा तपशील महासंघाचे अध्यक्ष पेणकर यांनी पुरविला. सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या सध्या ६० टक्के आहे, असा दावा त्यांनी केला. उर्वरित ४० टक्के रिक्षा सीएनजीवर येणे गरजेचे आहे. १०० टक्के रिक्षा सीएनजीवर येण्यास किमान वर्षाचा कालावधी जाईल. जोवर सर्व रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होत नाहीत, तोवर त्यांचे वेगळे भाडे दर आरटीओकडून निश्चित केले जात नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सीएनजी रिक्षांच्या प्रमाणाबाबत आरटीओ आणि संघटनांत मतभेद आहेत. सीएनजी रिक्षाचालकांना पंपांवर स्वस्त दरात गॅस मिळतो, तरीही नियमानुसार ते प्रवाशांकडून पेट्रोलचेच भाडे वसूल करतात.