शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ दोनच दिवस लसीकरण विविध भागांत सुरू आहे. त्यातही ऑगस्ट महिन्यात १२ दिवसांत जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसी उपलब्ध झाल्याने आठवड्यातून दोनवेळाच लसीकरण झालेले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्केच अर्थात केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्याचे लसीकरण अद्यापही कितीतरी पटीने मागे आहे. वेग अधिक असता तर आतापर्यंत ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे गरजेचे होते.

कोरोनाला रोखण्यासाठी जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला वेगाने लसीकरण मोहीम सुरू होती. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन, हेल्थवर्कर यांना लस दिली. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याचे लसीकरणाचे एकूण टार्गेट ९९ लाख ४२ हजार ४०७ एवढे अपेक्षित धरले आहे. परंतु, आतापर्यंत केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये १८ लाख ७१ हजार ६६७ जणांना पहिला, तर केवळ ७ लाख ८१ हजार ७७४ जणांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून तर लसीकरणाचा वेग फारच मंदावला आहे. आठवड्यातून एक ते दोन वेळाच लसीकरण होत आहे. मध्यंतरी, पाऊस जास्तीचा झाल्याचे कारण देऊन लस मिळत नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. परंतु, त्याच कालावधीत किंबहुना आतादेखील खाजगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. खाजगी रुग्णालयांना लसी मिळतात आणि शासकीय यंत्रणांना का मिळत नाहीत, यावरूनदेखील सध्या वादंग सुरू आहे. त्यातही मागील १२ दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तोदेखील तुटपुंजा असून या कालावधीत केवळ ९९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे. त्याचे नियोजन करताना प्रत्येक महापालिकेला तीन ते पाच हजार लसींचाच साठा मिळू शकलेला आहे. त्यामुळेच आठवडाभरात केवळ दोन वेळाच लसीकरण मोहीम सुरू असल्याचे दिसून आले आहे.

आता १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवासाची मुभा दिली आहे. परंतु, लाखो नागरिकांना कुठे पहिला, तर कुठे दुसरा डोस अद्यापही मिळू शकलेला नाही. मागील १२ दिवसांत ३ ऑगस्ट ६६ हजार तर ७ ऑगस्टला ३३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. एकूणच जिल्ह्यातील एकूण लक्ष्यांकाच्या मानाने लसीकरणाचा वेग प्रभावी असता, तर आतापर्यंत जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अवघे २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

जिल्हानिहाय- पहिला डोस-दुसरा डोस - टक्केवारी

ठाणे ग्रामीण - ३६१९६१ - ११९४५७ - २३

कल्याण-डोंबिवली - ३२६२२८ - १२९७२७ - ४०

उल्हासनगर- ८०९३८ - २४३२४ - ३०

भिवंडी- ८७०७४ - २९९४५ - ३४

ठाणे - ४४५४३४ - १७५२८३ - ३९

मीरा-भाईंदर-२३८९७१ - १३०९५२ - ५५

नवी मुंबई- ३३१०६१ - १७२०८६ - ५२

------------------------------------------------

एकूण - १८७१६६७ - ७८१७७४ - ४०