शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ दोनच दिवस लसीकरण विविध भागांत सुरू आहे. त्यातही ऑगस्ट महिन्यात १२ दिवसांत जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसी उपलब्ध झाल्याने आठवड्यातून दोनवेळाच लसीकरण झालेले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्केच अर्थात केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्याचे लसीकरण अद्यापही कितीतरी पटीने मागे आहे. वेग अधिक असता तर आतापर्यंत ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे गरजेचे होते.

कोरोनाला रोखण्यासाठी जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला वेगाने लसीकरण मोहीम सुरू होती. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन, हेल्थवर्कर यांना लस दिली. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याचे लसीकरणाचे एकूण टार्गेट ९९ लाख ४२ हजार ४०७ एवढे अपेक्षित धरले आहे. परंतु, आतापर्यंत केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये १८ लाख ७१ हजार ६६७ जणांना पहिला, तर केवळ ७ लाख ८१ हजार ७७४ जणांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून तर लसीकरणाचा वेग फारच मंदावला आहे. आठवड्यातून एक ते दोन वेळाच लसीकरण होत आहे. मध्यंतरी, पाऊस जास्तीचा झाल्याचे कारण देऊन लस मिळत नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. परंतु, त्याच कालावधीत किंबहुना आतादेखील खाजगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. खाजगी रुग्णालयांना लसी मिळतात आणि शासकीय यंत्रणांना का मिळत नाहीत, यावरूनदेखील सध्या वादंग सुरू आहे. त्यातही मागील १२ दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तोदेखील तुटपुंजा असून या कालावधीत केवळ ९९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे. त्याचे नियोजन करताना प्रत्येक महापालिकेला तीन ते पाच हजार लसींचाच साठा मिळू शकलेला आहे. त्यामुळेच आठवडाभरात केवळ दोन वेळाच लसीकरण मोहीम सुरू असल्याचे दिसून आले आहे.

आता १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवासाची मुभा दिली आहे. परंतु, लाखो नागरिकांना कुठे पहिला, तर कुठे दुसरा डोस अद्यापही मिळू शकलेला नाही. मागील १२ दिवसांत ३ ऑगस्ट ६६ हजार तर ७ ऑगस्टला ३३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. एकूणच जिल्ह्यातील एकूण लक्ष्यांकाच्या मानाने लसीकरणाचा वेग प्रभावी असता, तर आतापर्यंत जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अवघे २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

जिल्हानिहाय- पहिला डोस-दुसरा डोस - टक्केवारी

ठाणे ग्रामीण - ३६१९६१ - ११९४५७ - २३

कल्याण-डोंबिवली - ३२६२२८ - १२९७२७ - ४०

उल्हासनगर- ८०९३८ - २४३२४ - ३०

भिवंडी- ८७०७४ - २९९४५ - ३४

ठाणे - ४४५४३४ - १७५२८३ - ३९

मीरा-भाईंदर-२३८९७१ - १३०९५२ - ५५

नवी मुंबई- ३३१०६१ - १७२०८६ - ५२

------------------------------------------------

एकूण - १८७१६६७ - ७८१७७४ - ४०