शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ दोनच दिवस लसीकरण विविध भागांत सुरू आहे. त्यातही ऑगस्ट महिन्यात १२ दिवसांत जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसी उपलब्ध झाल्याने आठवड्यातून दोनवेळाच लसीकरण झालेले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्केच अर्थात केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्याचे लसीकरण अद्यापही कितीतरी पटीने मागे आहे. वेग अधिक असता तर आतापर्यंत ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे गरजेचे होते.

कोरोनाला रोखण्यासाठी जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला वेगाने लसीकरण मोहीम सुरू होती. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन, हेल्थवर्कर यांना लस दिली. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याचे लसीकरणाचे एकूण टार्गेट ९९ लाख ४२ हजार ४०७ एवढे अपेक्षित धरले आहे. परंतु, आतापर्यंत केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये १८ लाख ७१ हजार ६६७ जणांना पहिला, तर केवळ ७ लाख ८१ हजार ७७४ जणांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून तर लसीकरणाचा वेग फारच मंदावला आहे. आठवड्यातून एक ते दोन वेळाच लसीकरण होत आहे. मध्यंतरी, पाऊस जास्तीचा झाल्याचे कारण देऊन लस मिळत नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. परंतु, त्याच कालावधीत किंबहुना आतादेखील खाजगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. खाजगी रुग्णालयांना लसी मिळतात आणि शासकीय यंत्रणांना का मिळत नाहीत, यावरूनदेखील सध्या वादंग सुरू आहे. त्यातही मागील १२ दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तोदेखील तुटपुंजा असून या कालावधीत केवळ ९९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे. त्याचे नियोजन करताना प्रत्येक महापालिकेला तीन ते पाच हजार लसींचाच साठा मिळू शकलेला आहे. त्यामुळेच आठवडाभरात केवळ दोन वेळाच लसीकरण मोहीम सुरू असल्याचे दिसून आले आहे.

आता १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवासाची मुभा दिली आहे. परंतु, लाखो नागरिकांना कुठे पहिला, तर कुठे दुसरा डोस अद्यापही मिळू शकलेला नाही. मागील १२ दिवसांत ३ ऑगस्ट ६६ हजार तर ७ ऑगस्टला ३३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. एकूणच जिल्ह्यातील एकूण लक्ष्यांकाच्या मानाने लसीकरणाचा वेग प्रभावी असता, तर आतापर्यंत जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अवघे २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

जिल्हानिहाय- पहिला डोस-दुसरा डोस - टक्केवारी

ठाणे ग्रामीण - ३६१९६१ - ११९४५७ - २३

कल्याण-डोंबिवली - ३२६२२८ - १२९७२७ - ४०

उल्हासनगर- ८०९३८ - २४३२४ - ३०

भिवंडी- ८७०७४ - २९९४५ - ३४

ठाणे - ४४५४३४ - १७५२८३ - ३९

मीरा-भाईंदर-२३८९७१ - १३०९५२ - ५५

नवी मुंबई- ३३१०६१ - १७२०८६ - ५२

------------------------------------------------

एकूण - १८७१६६७ - ७८१७७४ - ४०