शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

 भारतातील ७० टक्के लोकं शेवटच्या टप्यातील कर्करोगावर उपचार करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:39 IST

कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.  परंतु,  भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या  तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार  सुरु करीत असल्याची माहिती

 - राजू काळेभाईंदर, दि. 24  - भारतात  कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आधुनिक जीवनशैलीमुळे या रोगाने चांगलेच हातपाय पसरविले आहेत. कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत.कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.  परंतु,  भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या  तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार  सुरु करीत असल्याची माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कर्करोग तज्ञ डॉ. उमा डांगी,  गॅस्ट्रोएंटरोलॉजी व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ इमरान शेख तसेच व्हेरिकोज  व्हेन्सचे तज्ञ  डॉ हिमांशू शहा यांनी एका शिबिरात दिली. डॉ. उमा डांगी यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या शहरीरातील पेशींची नियंत्रित वाढ आणि विघटन होणं आवश्यक असतं. काही पेशी वृद्ध किंवा खराब होतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात. परंतु या नवीन पेशींची वाढ विशिष्ट अवयवांत असंतुलित आणि अनियमित होते. त्यावेळी त्या अवयवाला कर्करोग झाल्याचे निदान होते.  शरीराच्या कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो. तेथून तो  इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाबद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी की, कर्करोग पहिल्या स्टेजला असेल तर त्याची लक्षात येण्यासारखी लक्षणं फार थोडी असतात. त्यात शरीरावरील अथवा शरीरामध्ये गाठ आणि जखम बरी न होणे, सतत खोकला, तसेच कफातून बाहेर येणारं रक्त, आवाजात बदल होणे, गिळण्यास त्रास होणे, वजन घटणे, भूक न लागणे, रक्त किंवा पांढरा स्त्राव अंगावरून जाणे, लघवी आणि शौचामध्ये बदल या लक्षणांचा समावेश आहे. रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले कि, कर्करोग झाला आहे असं कळल्यावर सामान्य माणसाच्या मनात या आजाराविषयी  प्रचंड भीती निर्माण होते. या भीतीपोटीच त्यांचे  मानसिक, शारीरिक खच्चीकरण होते. त्यातून त्याची उपचारांना प्रतिकार करण्याची क्षमता नष्ट होऊ लागते. परिणामी रुग्ण दगावतो. म्हणूनच कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी त्याची माहिती रुग्णांनी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा सामना योग्य प्रकारे करता येतो.