शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 भारतातील ७० टक्के लोकं शेवटच्या टप्यातील कर्करोगावर उपचार करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:39 IST

कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.  परंतु,  भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या  तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार  सुरु करीत असल्याची माहिती

 - राजू काळेभाईंदर, दि. 24  - भारतात  कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आधुनिक जीवनशैलीमुळे या रोगाने चांगलेच हातपाय पसरविले आहेत. कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत.कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.  परंतु,  भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या  तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार  सुरु करीत असल्याची माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कर्करोग तज्ञ डॉ. उमा डांगी,  गॅस्ट्रोएंटरोलॉजी व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ इमरान शेख तसेच व्हेरिकोज  व्हेन्सचे तज्ञ  डॉ हिमांशू शहा यांनी एका शिबिरात दिली. डॉ. उमा डांगी यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या शहरीरातील पेशींची नियंत्रित वाढ आणि विघटन होणं आवश्यक असतं. काही पेशी वृद्ध किंवा खराब होतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात. परंतु या नवीन पेशींची वाढ विशिष्ट अवयवांत असंतुलित आणि अनियमित होते. त्यावेळी त्या अवयवाला कर्करोग झाल्याचे निदान होते.  शरीराच्या कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो. तेथून तो  इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाबद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी की, कर्करोग पहिल्या स्टेजला असेल तर त्याची लक्षात येण्यासारखी लक्षणं फार थोडी असतात. त्यात शरीरावरील अथवा शरीरामध्ये गाठ आणि जखम बरी न होणे, सतत खोकला, तसेच कफातून बाहेर येणारं रक्त, आवाजात बदल होणे, गिळण्यास त्रास होणे, वजन घटणे, भूक न लागणे, रक्त किंवा पांढरा स्त्राव अंगावरून जाणे, लघवी आणि शौचामध्ये बदल या लक्षणांचा समावेश आहे. रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले कि, कर्करोग झाला आहे असं कळल्यावर सामान्य माणसाच्या मनात या आजाराविषयी  प्रचंड भीती निर्माण होते. या भीतीपोटीच त्यांचे  मानसिक, शारीरिक खच्चीकरण होते. त्यातून त्याची उपचारांना प्रतिकार करण्याची क्षमता नष्ट होऊ लागते. परिणामी रुग्ण दगावतो. म्हणूनच कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी त्याची माहिती रुग्णांनी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा सामना योग्य प्रकारे करता येतो.