शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

फेरमतमोजणीत ७ जण विजयी

By admin | Updated: February 24, 2017 07:02 IST

मतमोजणीच्या वेळी उडालेल्या सावळा गोंधळामुळे सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभरात झालेल्या फेरमतमोजणीत

सदानंद नाईक / उल्हासनगरमतमोजणीच्या वेळी उडालेल्या सावळा गोंधळामुळे सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभरात झालेल्या फेरमतमोजणीत सात जण, तर एकाची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. दरम्यान, सात जणांमध्ये शिवसेनेच्या शुभांगी बहेनवाल, ओमी टीमच्या कविता रगडे, भाजपाच्या कविता गायकवाड, रवी बागुल, आशा बिऱ्हाडे, रवी जग्यासी, साई पक्षाचे रवी गुप्ता यांचा समावेश आहे.उल्हासनगर प्रभाग क्रमांक १२ अ मधून सुरुवातीला साई पक्षाच्या वीरांगना सिंग यांना विजयी घोषित केले होते. ओमी टीमच्या कविता रगडे यांनी आक्षेप घेतल्यावर झालेल्या फेरमतमोजणीत रगडे यांना विजयी घोषित केले. तर, प्रभाग क्रमांक ३ च्या पॅनलमधील शिवसेनेचे चारही नगरसेवक विजयी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पुन्हा झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, चरणजित कौर भुल्लर, भाजपाचे रवींद्र बागुल, नाना बिऱ्हाडे यांना विजयी घोषित केले. तसाच प्रकार प्रभाग क्रमांक २० मध्ये झाला. शिवसेनेचे आकाश व विकास पाटील, साई पक्षाच्या पूजा शिरसवर विजयी झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. नंतर, शिरसवर यांच्याऐवजी भाजपाच्या कविता गायकवाड विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. प्रभाग क्रमांक ७ मध्येही गोंधळ उडाला. तेथे रिपाइंचे भगावान भालेराव, अपेक्षा भालेराव, भाजपाच्या शुभांगिनी निकम, लक्ष्मी सिंग विजयी झाल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. तर, प्रभाग क्र. ९ मधून भाजपाचे मनोज लासी, डिम्पल ठाकूर, दीपा पंजाबी विजयी झाल्याचे सांगण्यात आले. फेरमतमोजणीत लासी यांच्याऐवजी साई पक्षाचे अजित गुप्ता यांना विजयी घोषित केले. प्रभागा क्र. ११ मधून साई पक्षाच्या कविता पंजाबी, प्रवीण कृष्णानी, इंदिरा उदासी, जीवन इदनानी विजयी झाल्याचे सांगितल्यावर फेरमतमोजणीची मागणी झाली. त्यात कृष्णानी यांच्याऐवजी भाजपाचे रवी जग्यासी यांना विजयी घोषित केले. पक्ष प्रतिनिधी व राजकीय नेत्यांमुळे गोंधळ उडाल्याने असे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मतमोजणी नियमानुसार झाल्याची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. काँग्रेस गटनेत्यांचा पराभवउल्हासनगरमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पॅनल क्रमांक १७ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. हीच लढत काँग्रेसला भारी पडली. काँग्रेसच्या गटनेत्या जया साधवानी आणि त्यांचे पती मोहन साधवानी यांचा या मैत्रीपूर्ण लढतीत पराभव झाला. सर्व शहरात आघाडी झालेली असतानादेखील या पॅनलमध्ये काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत करून स्वत:चे अस्तित्व धोक्यात घातले. या प्रभागात आघाडी झाली असती, तर काँग्रेसलादेखील या ठिकाणी विजयाचा हिस्सा मिळाला असता. काँग्रेसचा एकच नगरसेवक उल्हासनगरमध्ये काँग्रेसचे पूर्वी ८ नगरसेवक होते. मात्र, ६ नगरसेवकांनी इतर पक्षांत प्रवेश केल्याने केवळ काँग्रेसकडे दोनच नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेविका पडली असून उर्वरित एक नगरसेविका असलेल्या अंजली साळवे यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसला उल्हासनगरमध्ये खाते उघडता आले आहे. ज्या प्रभागातून साळवे निवडून आल्या, त्या पॅनलमध्ये कोणत्याही एका पक्षाला झुकते माप मिळालेले नाही. त्यातही काँग्रेसने ही जागा पुन्हा राखल्याने काँग्रेसचे अस्तित्व टिकून आहे. चिठ्ठी काढून दिला निकालच्उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक १८ क मध्ये शिवसेनेच्या सविता दिवटे आणि भारिपच्या कविता बागुल यांना समान मते मिळाली. च्आधी कविता बागुल यांना विजयी घोषित केले होते. मात्र, नंतर पुनर्मतमोजणी झाल्यावर या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याचे समोर आले. च्समान मते मिळाल्याने या दोन्ही उमेदवारांचा निकाल चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आला. त्यात कविता बागुल यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. बीएसपी आणि मनसेला भोपळा : गेल्या पालिका निवडणुकीत बीएसपीने २ जागांवर विजय मिळवत सर्वांना धक्का दिला होता. तर, मनसेनेदेखील एक जागा जिंकत आपले अस्तित्व निर्माण केले होते. मात्र, या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या हाती निराशा आली. बीएसपी दोनवरून थेट शून्यावर आली आहे, तर मनसेलादेखील आपला १ चा आकडा कायम ठेवता आलेला नाही. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने खाते उघडलेउल्हासनगर महापालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक १८ ब मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीने आपले खाते उघडले आहे. या निवडणुकीत सुभाष टेकडी परिसरात दलित वस्तीत कोणाला विजय मिळेल, याची शाश्वती कोणालाच नव्हती. मात्र, या निवडणुकीत प्रमोद टाले यांनी विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या विजयामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीने या शहरात आपले खाते उघडले आहे.