शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यासाठी ६८ कोटीचा निधी पडून!

By सदानंद नाईक | Updated: January 7, 2024 19:53 IST

महापालिकेकडून रस्ता बांधणीला एनओसी.

उल्हासनगर : शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता बांधणीला शासनाने दिलेला ६८ कोटीचा निधी गेल्या काही महिन्यापासून पडून आहे. महापालिकेने बांधकाम विभागाला ना हरकत प्रमाणपत्र देऊनही काम सुरू न झाल्याने, बांधकाम विभागाच्या कारभारावर टीका होत आहे.

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिकेने १०० फुटी रुंदीकरण केले आहे. या रुंदीकरणात ८५० पेक्षा जास्त व्यापारी व नागरिक बाधित झाले असून त्यापैकी १० ते १२ जण न्यायालयात गेले. त्यामुळे आजही काही बांधकामे रस्त्याला अडसर ठरत आहेत. रस्ता बांधणीसाठी पहिल्या दोन टप्प्यात ३६ कोटीचा निधी मंजूर होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या निविदा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात १० तर चौथ्या टप्प्यात २२ कोटीचा निधी असा एकून ६८ कोटीचा निधी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर झाला. तिसऱ्या व चौथा टप्प्यात मिळालेल्या निधीतील कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली. महापालिकेने या कामासाठी ना हरकतपत्र बांधकाम विभागाला दिल्याची माहिती महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. 

शहरातील मुख्य कल्याण ते अंबरनाथ रस्त्यासाठी एकून ६८ कोटीचा निधी येऊनही रस्ता बांधकामाला सुरवात झाली नसल्याने, सार्वजनिक बांधकाम विभाग वादात सापडला आहे. रस्ता बांधणीपूर्वी पाणी व भुयारी गटारीचे कामे करून घ्या, असे महापालिकेला कळविले आहे. मात्र त्यांच्याकडून काहीएक उत्तर आले नसल्याने, रस्त्याचे काम सुरू केले नाही. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली. तर महापालिके कडून रस्ता बांधणीला काहीएक हरकत नसून बांधकाम विभागाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तर शहरातील मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू करावे, असे मत महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले. चौकट रस्ता पूर्णतः बंद करू नये.... आयुक्त अजीज शेख शहरातून जाणाऱ्या मुख्य कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू करावे. मात्र रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवावी. १०० फूट रस्ता असल्याने, वाहतुकीस अडथळा येणार नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर