शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

उल्हासनगर भुयारी गटारीच्या मुहूर्तानंतरच, कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे कामासाठी ६८ कोटी

By सदानंद नाईक | Updated: March 2, 2024 19:19 IST

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिकेने १०० फुटी रुंदीकरण केले.

उल्हासनगर : शहरातील भुयारी गटार योजनेला मुहूर्त लागल्यानंतरच कल्याण-अंबरनाथ रस्ता बांधणीला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली आहे.

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिकेने १०० फुटी रुंदीकरण केले. त्यानंतर रस्ता पुनर्बांधणीसाठी चार टप्प्यासाठी ६८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात ३६ कोटीचा निधी मंजूर होऊन, सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या निविदा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात १० तर चौथ्या टप्प्यात २२ कोटीचा निधी असा एकून ६८ कोटीचा निधी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर झाला. तिसऱ्या व चौथा टप्प्यात मिळालेल्या निधीतील कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली. महापालिकेने या कामासाठी ना हरकतपत्र बांधकाम विभागाला दिल्याची माहिती महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. मात्र शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून रस्त्याच्या खालून जाणाऱ्या भुयारी गटारीचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या पुनर्बांधणीला सुरवात होणार असल्याचे संकेत उपअभियंता मानकर यांनी दिली आहे. 

शहरातील मुख्य कल्याण ते अंबरनाथ रस्त्यासाठी आलेला निधी पडून असून रस्ता बांधकामाला सुरवात झाली नसल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागावर टिका होत आहे. रस्ता बांधणीपूर्वी पाणी व भुयारी गटारीचे कामे करून घ्या, असे महापालिकेला कळविले आहे. गटारीच्या कामामुळे रस्त्याचे काम सुरू केले नाही. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली आहे. रस्त्या खालील भुयारी गटारीचे काम सुरू करण्याचे संकेत महापालिकेचे शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. 

रस्ता पूर्णतः बंद करू नये...आयुक्त अजीज शेख

शहरातून जाणाऱ्या मुख्य कल्याण ते अंबरनाथ रस्त्या खालील भुयारी गटारीचे काम झाल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू करावे. मात्र रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवावी. १०० फूट रस्ता असल्याने, वाहतुकीस अडथळा येणार नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर