शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कर्जाचे आमिष दाखवून ६.७३ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:08 IST

विरारच्या नारंगी रोडचे रहिवासी अजय धीरजलाल दमानिया हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत.

ठाणे : कर्जाचे आमिष दाखवून विरारच्या रहिवाशाची ६ लाख ७३ हजारांना फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले. खंडणीविरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे.विरारच्या नारंगी रोडचे रहिवासी अजय धीरजलाल दमानिया हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. २०१३ साली त्यांना १० लाखांच्या कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी दमानिया हे बँकांकडे चौकशी करत असतानाच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी त्यांना कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून प्रक्रिया शुल्कापोटी ८० हजार ४११ रुपये भरण्यास सांगितले. दमानिया यांनी ही रक्कम धनादेशाद्वारे दिली, पण त्यांना कर्ज मंजूर झाले नाही. दमानिया यांनी पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी त्यांना काही बँकांचे खाते क्रमांक देऊन त्या खात्यांत पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, दमानिया यांनी तीन लाख ५२ हजार २४० रुपये जमा केले, तरीहीे त्यांना कर्ज मंजूर झाले नाही. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रिलायन्स आणि ओएनजी वैश्य कंपनीच्या दोन विमा पॉलिसी काढाव्या लागतील, असे आरोपींनी सांगितल्यानंतर दमानिया यांनी पॉलिसीही काढल्या. दरम्यानच्या काळात आरोपींनी बँक खात्यांमध्ये २ लाख ४० हजार ८१२ रुपये दमानिया यांच्याकडून भरून घेतले. मात्र, पाठपुरावा करूनही कर्ज मिळत नसल्याचे पाहून, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दमानिया यांनी शनिवारी ठाणेनगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अनुप सोनी, नीतू शर्मा, अभिषेक मित्तल, ऋषी अग्रवाल व सोनिया वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींनी दमानिया यांच्याशी फोनद्वारेच संपर्क साधला आहे. त्यामुळे आरोपींची नावे खरी आहेत की खोटी, हे आताच सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी