शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अंबरनाथ नगरपालिकेचा 64 वा वर्धापन दिन साजरा

By पंकज पाटील | Updated: May 11, 2023 16:43 IST

अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले.

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेचा 64 वा वर्धापन दिन पालिका कार्यालयात साजरा करण्यात आला ासाठी नव्या प्रशासकीय इमारतीची सजावट करण्यात आली होती तसेच सर्व राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांना आणि लोकप्रतिनिधींना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. 

अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले. 1970 ते 76 हा कार्यकाल अंबरनाथ शहराच्या गतिमान विकासाला चालना देणारी ठरला होती, मात्र त्याच कालावधीनंतर सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अंबरनाथ नगरपालिका 1978 मध्ये बरखास्त करण्यात आली. ज्या कार्यकालात अंबरनाथ शहराचा सुवर्णकाळ सुरू होता त्याच कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे अंबरनाथ नगर पालिकेचे अस्तित्वच धोक्यात आले. कालांतराने अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण डोंबिवली महापालिकेत करण्यात आला आणि त्याच कालावधीत अंबरनाथ शहराला उतरती कळा लागली. अंबरनाथ शहराला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी एक स्वतंत्र लढा सुरू झाला आणि या लढ्यात सहभागी झालेल्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र अशा परिस्थितीही हा लढा सुरूच ठेवत 14 एप्रिल 1992 मध्ये अंबरनाथ नगरपालिका स्वतंत्र करून घेण्यात आली.

1995 मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील पार पडल्या. नगरपालिका म्हणून शहराचे स्थित्यंतर सुरू असले तरी ज्या नगरपालिकेची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली होती तो स्थापना दिवस आजही पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी अखंडितपणे साजरा करीत आहेत. आज पालिकेचे कामकाज नव्या प्रशासकीय इमारतीत गेल्याने या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेचा वर्धापन दिन देखील उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि लोकप्रतिनिधींना पालिका कार्यालयात आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील विकास कामांची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली. यानंतर स्वतः मुख्याधिकारी रसाळ यांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाची माहिती आणि सुरू असलेल्या बांधकामाची माहिती दिली. यावेळी माजी गुलाबराव करंजुले पाटील, सुनील चौधरी, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, रिपाई सेक्युलरचे अध्यक्ष शाम गायकवाड, अब्दुल शेख, प्रदीप पाटील, सदाशिव पाटील त्यांच्यासह पालिकेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :ambernathअंबरनाथ