शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२७ गावांत ६० तास पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: April 25, 2016 03:02 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांत बुधवार ते शनिवार असे चार दिवस सलग ६० तास पाणीपुरवठा बंद होता.

चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांत बुधवार ते शनिवार असे चार दिवस सलग ६० तास पाणीपुरवठा बंद होता. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आधीच ‘घर का ना घाट का’ अशी स्थिती निर्माण झालेली असताना त्यात पाणीबाणीची भर पडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. याकडे संघर्ष समिती, शिवसेना, भाजपा किंवा नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक आणि पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्र ार आहे. पालिका निवडणूक होऊन पाच महिने उलटूनही जैसे थे स्थिती आहे. नगरसेवक निवडून येऊनही उपयोग काय झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून गावांचा पालिकेत समावेश झाल्याने समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. तर, निधीची तरतूद केली नसल्याने महापालिका चालढकल करत आहे. यामध्ये नागरिकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात ड प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)