शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोरोनामुळे बेघर झालेल्या ५८ वर्षीय महिलेला मिळाला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

ठाणे : लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे बेघर झालेल्या आणि तब्बल सहा महिने बस स्टॉपवर गुजराण करीत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला ठाण्यातील ...

ठाणे : लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे बेघर झालेल्या आणि तब्बल सहा महिने बस स्टॉपवर गुजराण करीत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला ठाण्यातील तरुणाईने निवारा मिळवून दिला.

या महिलेचे तौक्ते चक्रीवादळामुळे सर्व सामान भिजून गेले, अगदी डोक्यावर बांधलेले छप्पर देखील उडाले. ठाण्यातील काही तरुण तरुणींच्या नजरेस ही महिला पडली तेव्हा त्यांनी तिची रीतसर माहिती काढून शहानिशा करून ठाणे महापालिका आणि अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या निवारा केंद्रात दाखल केले. अजय भोसले आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

कमलाबाई दळवी असे या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री देशमुख हिला त्या प्रथम दिसल्या. बसस्टॉपवर ती सहा महिने त्यांना पाहत होती. पाच दिवसांपूर्वी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे तिची झालेली परिस्थिती पाहून तिने विचारपूस केली. त्यावेळी त्यांना कोणीही नसल्याचे तिने सांगितले. पतीचे निधन झाल्यानंतर घरकाम करून ती स्वतःचा उदरनिर्वाह करीत होती. लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले आणि घरभाडे थकल्याने घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितले. त्यावेळी त्या हॅप्पी व्हॅली समोरील सहयोग बस स्टॉपसमोर राहायला आल्या. पाऊस आला म्हणून भाग्यश्री त्यांना छत्री द्यायला गेली त्यावेळी वादळ सुटले होते. त्यांना तिने स्वखर्चातून ताडपत्री दिली पण सोसाट्याचा वारा सुटल्याने ते उडून गेले. म्हणून या महिलेसाठी निवारा शोधण्याचे तिने प्रयत्न केले. समता विचार प्रसारक संस्थेचा कार्यकर्ता अजय भोसले याला ही घटना कळल्यानंतर त्याने भाग्यश्रीशी संपर्क साधून त्या महिलेने सांगितलेल्या हकिकतीची सर्वप्रथम शहानिशा केली. पावसात त्यांचे सर्व सामान भिजले असल्याने भाग्यश्रीने स्वखर्चातून त्यांना कपडे, बॅग, खाण्याचे समान विकत घेतले. आरती भोर यांनी त्या महिलेसाठी मोफत ब्लाऊज शिवून दिले. अमोल जाधव हे त्यांच्या जेवणाची सोय करतच होते. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. त्यांना आश्रमात ठेवण्याचा विचार अजयने केल्यानंतर काही आश्रममधून पैशाची मागणी झाल्याने अजयने तो विचार सोडला. परंतु, हिंमत न हारता शोध सुरू ठेवला. त्याने धर्मवीर आनंद दिघे विचार मंच व सेवाचे संस्थापक जयदीप कोर्डे यांना संपर्क केला त्यावेळी मनपाच्या निवारा केंद्राचा त्यांनी संदर्भ दिला. बुधवारी अजयने दळवी यांना आश्रमात दाखल केले. सुरुवातीला त्यांची मानसिक तयारी नव्हती. व्यवस्थित समजून सांगितल्यावर त्या तयार झाल्याचे अजयने सांगितले. निवारा केंद्राचे व्यवस्थापक संदीप सरदार म्हणाले की, दळवी यांना काही काळ ठेवले जाईल. पुढे चांगल्या ठिकाणी सोय झाल्यावर त्या ठिकाणी पाठवले जाईल. दळवी यांच्याशी संपर्क केल्यावर त्या म्हणाल्या, माझा पहिला दिवस चांगला गेला आहे.

या मदतीसाठी समता विचार प्रसारक संस्था व कार्यकर्ते सायली साळवी, दर्शन पडवळ, इनोक कोलीयर, रवी इसाक, ओम गायकवाड, शुभम कोळी यांनीही मोलाची मदत केल्याचे अजयने सांगितले.

-------------/--