शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मुंब्रा, शीळ भागातील ५७ हजार वीज्र ग्राहकांनी महावितरणचे थकविले तब्बल ३०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:21 IST

मुंब्रा शीळ भागातील वीज बिलांचा भरणा न करणाºया तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. या खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदारांनी तब्बल ३०० कोटी थकविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्याना वारंवार मारहाणअभय योजनेलाही अल्प प्रतिसाद

ठाणे - महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शिळ या भागात महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने धडक कारवाई करुन मागील आठ महिन्यात १३६४ वीज चोऱ्या पकडल्या आहेत. यामध्ये त्यांच्याकडून एक कोटी ९५ लाख वसुल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महावितरणने मुंब्रा, शीळ भागात तब्बल ५७ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ग्राहकांकडे मुद्दल आणि व्याजासह ३०० कोटींची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या सुत्रांनी दिली आहे.

                  महावितरणने आॅगस्ट २०१७ पासून पकडलेल्या १३६४ केसेसमध्ये एकूण १९ हजार ५११ इतक्या युनिटची वीज चोरी करण्यात आली असून याचे मुल्य सुमारे एक कोटी ९५ लाख इतके होते. यापैकी ६५० विजचोरांनी सुमारे एक कोटी सात लाख रु पयांचा भरणा केला आहे. यामध्ये ६५० पैकी ४९० ग्राहकांनी नियमानुसार तडजोड करून सुमारे १८ लाखांची दंडाची रक्कम महावितरणकडे भरणा केली आहे. तर उर्वरीत ग्राहकांकडे महावितरणचे अधिकारी पाठपुरावा करत असून त्यांनी दंडासह रक्कम न भरल्यास त्यांच्यावर रितसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.अभय योजनेस अत्यंत अल्प प्रतिसादमहावितरणने कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु मुंब्रा व शिळ या भागातून अशा योजनांना नेहमीच अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या भागात सुमारे ५७ हजार इतक्या ग्राहकांची वीज कायम स्वरूपी खंडित केली असून त्यांच्याकडे २५० कोटी मुद्दल व ५० कोटी व्याज अशी एकूण सुमारे ३०० कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. असे असले तरी सध्या सुरु असलेल्या अभय योजने अंतर्गत ठाणे ३ विभागात नव्याने रु जू झालेले टीमने सुमारे दोन हजार ग्राहकांकडून सुमारे दोन कोटी वसूल केले आहेत.एजंट लोकांच्या भूलथापांना बळी न पडता; ग्राहकांना सहकार्याचे आवाहनमहावितरणने चालू व थकीत वीज बिल वसुली करता तसेच नवीन जोडणी व अन्य सुविधांकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा एजंटच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. ग्राहकांनी एजंटवर विश्वास टाकल्यास आणि त्यांची फसवणूक झाल्यास त्याबाबतची कोणतीही जबाबदारी महावितरण घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सध्या मार्च एंड असल्यामुळे ग्राहकांनी त्यांचे चालू तसेच थकीत बिल दंडासह भरवीत. याकरता महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्रात जावे किंवा महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.कर्मचाऱ्याना मारहाणवीज बील वसुली व इतर दैनंदिन कामे करताना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण होण्याच्या घटना मुंब्रा व शिळ या भागात मोठ्या प्रमाणात होतात. मागील आठ महिन्यात कर्मचाºयांना मारहाणीच्या एकूण सहा घटना घडल्या आहेत. यातील सर्व दोषी ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राcommissionerआयुक्त